महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 22, 2021, 11:25 PM IST

ETV Bharat / sitara

'जय भीम'च्या दिग्दर्शकाने मागितली माफी, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

'जय भीम' हा चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी तमिळ आणि तेलगूसह इतर भाषांमध्ये प्रदर्शित झाला. 'जय भीम' चित्रपटाने तमिळनाडूमध्ये एका वादाला तोंड फोडले आहे. वन्नियार संगम आणि समुदायाच्या सदस्यांनी आरोप केला आहे की त्यांचे या चित्रपटात वाईट पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे. जय भीम हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon-Prime Video वर प्रदर्शित झाला.

'जय भीम'च्या दिग्दर्शकाने मागितली माफी
'जय भीम'च्या दिग्दर्शकाने मागितली माफी

चेन्नई - अभिनेता सुर्या याची प्रमुख भूमिका असलेला "जय भीम" हा चित्रपट तामिळनाडूमध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ज्ञानवेल यांनी वन्नियार संगम समुदायाला विनंती केली की, कोणत्याही विशिष्ट समुदायाला दुखावण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता आणि त्यांना झालेल्या त्रासाबद्दल खेद वाटतो.

1 नोव्हेंबर रोजी तमिळ आणि तेलुगूसह इतर भाषांमध्ये रिलीज झालेल्या 'जय भीम' ने तमिळनाडूमध्ये वादाला तोंड फोडले आहे, जिथे वन्नियार संगम आणि समुदायाच्या सदस्यांनी आरोप केला आहे की त्यांना चित्रपटात वाईट पद्धतीने चित्रित करण्यात आले आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon-Prime Video वर प्रदर्शित झाला.

चित्रपटाच्या निर्मितीमध्ये "कोणत्याही व्यक्तीचा किंवा समुदायाचा अपमान करण्याची किंचितही कल्पना नाही" यावर ज्ञानवेल यांनी भर दिला. ते म्हणाले, 'यामुळे दुखावलेल्यांप्रती मी मनापासून शोक व्यक्त करतो.' या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचा मुख्य अभिनेता आणि जय भीमचा निर्माता असलेल्या सुर्याला झालेल्या त्रासाबद्दल चित्रपट दिग्दर्शकाने खेदही व्यक्त केला.

एका बदमाश पोलीस उपनिरीक्षकाला 'गुरु' (गुरुमूर्ती) नावाची व्यक्तीरेखा दिल्यामुळे आणि एका दृश्याच्या पार्श्वभूमीत, कॅलेंडरमध्ये समुदायाचे अग्निकुंड चिन्ह वापरणे आणि अग्रभागी एका निष्पाप आदिवासी माणसाची पोलीस उपनिरीक्षकांकडून हत्या दाखवणे हा या वादाचे मूळ आहे. यामुळे वन्नियार समाजाची कथित निंदा असल्याचे सांगितले जात आहे.

ज्ञानवेल यांनी एका निवेदनात दावा केला आहे की, "मला कल्पना नव्हती की पार्श्वभूमीत लावलेल्या कॅलेंडरचा समुदायाचा संदर्भ म्हणून अर्थ लावला जाईल. कोणत्याही विशिष्ट समुदायाच्या संदर्भाचे प्रतीक बनवण्याचा आमचा हेतू नव्हता आणि तो 1995 सालचा काळ प्रतिबिंबित करण्याचा हेतू होता."

हेही वाचा - आर्यन खानविरुध्द कट रचणाऱ्यांना शाहरुख शिकवणार धडा?

ABOUT THE AUTHOR

...view details