महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'ईन्शाल्ला' चित्रपटातून सलमान खानची माघार?, भन्साळींबाबत काय म्हणाला भाईजान

सलमानचा 'ईद'च्या मुहूर्तावर 'ईन्शाल्ला' जरी प्रदर्शित होत नसला, तरीही त्याने त्याच्या 'किक २'चे संकेत दिले आहेत.

By

Published : Aug 27, 2019, 4:46 PM IST

Updated : Aug 27, 2019, 6:13 PM IST

संजय लीला भंसाळी चित्रपटाला योग्य न्याय देतील - सलमान खान

मुंबई -बॉलिवूडच्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना ओळखले जाते. त्यांनी आजवर बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. सलमान खानसोबत त्यांनी 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटासाठी काम केले होते. आता पुन्हा एकदा सलमानला घेऊन ते 'ईन्शाल्ला' चित्रपटाचे काम करणार होते. मात्र, या चित्रपटाला तात्पुरता ब्रेक लागल्याचे समोर आले आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या 'ईन्शाल्ला'मध्ये आता सलमान खान काम करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सलमान खानने एका माध्यमाशी बोलताना म्हटलेय, की भन्साळी या चित्रपटाला योग्य तो न्याय देतील. त्यांना जसा हवा तसा ते चित्रपट बनवतील. आमच्यामध्ये नेहमी मैत्री होती आणि ती कायम अशीच राहील. त्यांच्याही मनात माझ्याविषयी कोणती शंका नसेल, अशी मी आशा करतो, असे म्हणून त्याने संजय लीला भन्साळीला शुभेच्छा दिल्या. यावरुन सलमानने या चित्रपटातून माघार घेतली, असे म्हटले जात आहे.

'इंशाअल्लाह' किंवा 'किक २' असणार भाईजानकडून चाहत्यांसाठी ईदची भेट?

पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 'ईन्शाल्ला' चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सलमानचा 'ईद'च्या मुहूर्तावर 'ईन्शाल्ला' जरी प्रदर्शित होत नसला, तरीही त्याने त्याच्या 'किक २'चे संकेत दिले आहेत.

Last Updated : Aug 27, 2019, 6:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details