मुंबई - लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय झालाय. यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पराभवाबद्दल राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. पत्रकारांशी बोलताना रजनीकांत म्हणाले की, २०१९ च्या निवडणूकीत विजय फक्त नरेंद्र मोदी यांचा झालाय. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर मोदीच आहेत ज्यांनी लोकांना आपल्याकडे आकर्षित केलंय. ते एक करिश्माई नेते आहेत.
रजनीकांत यांनी सांगितले की, तामिळनाडूत मोदी विरोधी लाट होती. अनेक औद्योगिक योजना आखल्या जात आहेत, त्याची अंमलबजावणी न झाल्याने भारतीय जनता पक्षाचा राज्यात पराभव झाला. रजनीकांतच्या मते राहुल गांधी यांना पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. निवडणुकीच्या काळात राहुल गांधी मजबूतपणे लढले, कोणतीही कसूर सोडली नाही. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नीट समन्वय साधला नाही.