मुंबई - लेखिका आशापूर्णा देवीची कथा 'चुटी नकोच' वाचताच निर्माता सुमन मुखोपाध्याय यांना असे वाटले, की यावर चित्रपट बनवला पाहिजे. त्यानंतर त्यांनी या कथेचे अधिकार विकत घेतले आणि पटकथा लिहायला सुरुवात केली. चित्रपटाचे शीर्षक ठेवले 'नजरबंद'. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार असून या चित्रपटाचा हा वर्ल्ड प्रीमियर असेल.
मुखोपाध्याय यांनी म्हटले, "हा एक मनोवैज्ञानिक चित्रपट आहे. यात वासंती आणि चंदू या दोन पात्रांमधील प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. जर प्रेक्षक या व्यक्तीरेखांचा मनोवैज्ञानिक संघर्ष, त्यातील नाजुकपणा आणि अस्थिरता याच्यासोबत पुढे गेले तर हा चित्रपट काम करेल.''