महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नागराज मंजुळे यांना कॉ. बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार प्रदान - Nagraj Manjule honoured by comrade Balvantrao shirtonde award

वाझर (ता.खानापूर) येथील परिवर्तन चळवळीच्या वतीने कॉ. बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार नागराज मंजुळे यांना तर गीताताई शिरतोडे कर्तृत्ववान महिला स्मृतीपुरस्कार कॉ. स्मिता पानसरे यांना प्रदान करण्यात आला.

नागराज मंजुळे यांना कॉ. बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार प्रदान

By

Published : Nov 21, 2019, 10:36 PM IST

सांगली -'सैराट' फेम चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना वाझर (ता.खानापूर) येथील परिवर्तन चळवळीच्या वतीने यांना कॉ. बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आजच्या काळात तरुणाईने सजग होणे आवश्यक आहे. वाचनातून माणसांच्या विचाराबरोबर माणसं समजून घेतली पाहिजेत, असे आवाहन चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी यावेळी केले.

वाझर (ता.खानापूर) येथील परिवर्तन चळवळीच्या वतीने कॉ. बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार नागराज मंजुळे यांना तर गीताताई शिरतोडे कर्तृत्ववान महिला स्मृतीपुरस्कार कॉ. स्मिता पानसरे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक राजाभाऊ शिरपुप्पे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड, स्वागताध्यक्ष तथा सरपंच संजय जाधव, उपसरपंच हणमंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागराज मंजुळे यांना कॉ. बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार प्रदान

हेही वाचा -नागराज मंजुळे यांचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कारने सन्मान

कॉ. स्मिता पानसरे यांनीही आपले मत यावेळी व्यक्त केले. 'रेशम बागेतून देशप्रेमाची प्रमाणपत्र वाटण्याचे काम सुरू आहे. विचार मांडणे सोपे आहे. परंतू विचार अंगीकार करणे अवघड आहे. विचार कृतिशील असणे चळवळीला पोषक आहे. माहेरांकडून मिळालेला पुरस्कार ऊर्जा देणारा आहे. या पुरस्काराने जबाबदारी वाढली आहे', असे त्या यावेळी म्हणाल्या.

लेखक राजाभाऊ शिरगुप्पे म्हणाले, कला ही उच्च वर्गीयांची मिजासदारी होती. ती जनमाणसांत रूजविण्याचे काम नागराज आण्णांनी यांनी केले आहे.
स्वागताध्यक्ष तसेच सरपंच संजय जाधव, डॉ. बाबुराव गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार, व्ही.वाय. पाटील, अॅड. सुभाष पाटील, डॉ. अमोल पवार, डॉ. साधना पवार, दिलीप सव्वाशे, गार्गी कुलकर्णी, दीपक लाड, सत्याप्पा मोरे, सुशिल लाड , प्रा. नितिन रणदिवे, प्रा. सर्जेराव खरात, जयवंत आवटे, शांतिनाथ मांगले,देवकुमार दुपटे, रविंद्र येवले, अमोल माने, महादेव जाधव यांच्यासह परिवर्तन चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत आणि प्रास्ताविक विशाल शिरतोडे यांनी केले.

हेही वाचा - गोव्यातील ५० व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलची रंगारंग सुरुवात

सूत्रसंचालन शिवाजी रावळ यांनी केले. विक्रम शिरतोडे आभार यांनी मानले. हारूण मुल्ला, विलास साठे, विजय देवकर , निशिगंधा देवकर यांनी संयोजन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details