महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिजीत बिचुकलेविरोधातील तक्रार मागे, 'बिग बॉस'मध्ये परत जाणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष

मुळचा साताऱ्याचा असलेल्या बिचुकलेला आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली आहे. बिग बॉसमधील त्याची स्टाईल आणि इतर स्पर्धकांबद्दल केलेल्या शिवीगाळ प्रकरणी तो चर्चेत आला होता.

By

Published : Jun 25, 2019, 11:22 AM IST

Updated : Jun 25, 2019, 11:33 AM IST

अभिजीत बिचुकलेविरोधातील तक्रार मागे, 'बिग बॉस'मध्ये परत जाणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष

मुबंई -आपल्या स्टाईलमुळे नेहमी वादग्रस्त वागणुकीमुळे चर्चेत आलेला बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा स्पर्धक अभिजीत बिचुकलेला खंडणी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. त्याच्याविरोधातील तक्रार मागे घेतल्यामुळे त्याचा बिग बॉसचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, तो अटक झाल्यानंतर आता त्याला पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये प्रवेश मिळेल का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

मुळचा साताऱ्याचा असलेल्या बिचुकलेला आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली आहे. बिग बॉसमधील त्याची स्टाईल आणि इतर स्पर्धकांबद्दल केलेल्या शिवीगाळ प्रकरणी तो चर्चेत आला होता. काही दिवसांपूर्वीच त्याला चेक बाऊन्सप्रकरणी बिग बॉसच्या घरातून आरे पोलिसांनी अटक केले होते. मात्र, या प्रकरणात त्याला जामीन मिळाला होता. पण, २०१२ साली खंडणी प्रकरणातील त्याचा जामीन फेटाळण्यात आला होता. आता त्याच्याविरोधातील तक्रार फिर्यादीनेच मागे घेतल्याने त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बिचुकले विरुद्ध फिर्याद देणारे फिरोज पठाण यांनी आज खंडणीप्रकरणी फिर्याद मागरी घेत असल्याचे सांगितले आहे. साताऱ्याचं नाव खराब होऊ नये, म्हणून तक्रार मागे घेतली असे ते म्हणाले आहेत. तसेच त्याला बिग बॉसमध्ये घ्यावे, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

बिचुकलेविरोधातील तक्रार मागे

अभिजीत बिचुकलेने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना जोरदार टक्कर दिली. घरातील वेगवेगळ्या वादांमुळे तो चर्चेत राहिला. त्याच्या अटकेमागे राजकीय डाव असल्याचाही तो म्हणाला होता. आता त्याच्याविरोधातील तक्रार मागे झाल्यानंतर तो पुन्हा बिग बॉसमध्ये जाईल का, हे पाहणे रंजक ठरेल.

Last Updated : Jun 25, 2019, 11:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details