भारत देशात गेल्या ५०० वर्षात आपल्या हृदयात छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, अशा अनेक वीरपुत्रांच्या यशोगाथा कित्येक शतकांपासून जतन केल्या आहेत. अशीच एक पानिपतच्या लढाईची यशोगाथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची पहिली-वहिली संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे सच्चे देशभक्त मराठा जे पानिपतच्या लढाईत प्राणपणाने लढले ज्यांनी आपली निष्ठा आणि शौर्याची कमाल मर्यादा गाठली, अशा ऐतिहासिक पानिपतच्या मोठ्या लढाईचे चित्रण मोठ्या पडद्यावर केले आहे.
प्रत्येक मराठी माणसाला पानिपत हे भव्य युद्ध चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. चित्रपटात पानिपत युद्धाचे संपूर्ण चित्रण विषयाच्या प्रत्येक महत्वपूर्ण प्रसंग लक्षात घेऊन फक्त २ तास ३० मिनिटांत उलगडून दाखवला आहे.
पानिपत बहुश्रुत पण आत्तापर्यंत कोणीही न दाखवलेले युद्ध हे एक प्रत्येक मराठी पालकाचे व वरिष्ठ नागरिकांचे कर्त्तव्य आहे की ही अव्यक्त गोष्ट आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला दाखवली पाहिजे. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की मराठे शौर्यने लढले पण हार झाली ती विश्वासघाताने, त्यामुळे सर्वांनी हा चित्रपट सर्व मुलांना व नातवंडाना हा मराठ्यांचा पराक्रम दाखवला पाहिजे.