महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 5, 2020, 11:22 AM IST

Updated : May 5, 2020, 12:06 PM IST

ETV Bharat / sitara

प्रतिष्ठित कलाकारांच्या अंत्यसंस्काराला मला जाता आले नाही; ए.आर. रहमान यांनी व्यक्त केली खंत

ऋषी कपूर आणि इमरान खान यांच्या अंत्यसंस्काराला मला जाता आले नाही. याबातत ऑस्कर आणि ग्रॅमी-विजेता भारतीय संगीतकार ए.आर. रहमान यांनी खंत व्यक्त केली आहे.

ar-rahman-grieves-loss-of-rishi-kapoor-irrfan-khan
ar-rahman-grieves-loss-of-rishi-kapoor-irrfan-khan

मुंबई- ऋषी कपूर आणि इमरान खान यांच्या अंत्यसंस्काराला मला जाता आले नाही. याबातत ऑस्कर आणि ग्रॅमी-विजेता भारतीय संगीतकार ए.आर. रहमान यांनी खंत व्यक्त केली आहे.

हेही वाचा-कोरोना : दिवसभरात ७७१ नवे रुग्ण, राज्याचा आकडा १४ हजार ५४१ वर

2018 मध्ये न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने ग्रस्त झालेल्या इरफान यांनी वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. इमरान खान यांच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी एचएन रिलायंस फाउंडेशन रुग्णालयात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. मात्र, देशभरात लाॅकडाऊन असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थित त्यांचा अत्यसंस्कार करण्यात आला. या अंत्यसंस्काराला जाता न आल्याची खंत ए.आर. रहमान यांनी व्यक्त केली.

दरम्यान, कोरोना विरोधात देशाच्या लढाईत रहमान यांनी गीतकार प्रसून जोशी यांच्यासमवेत 'हम हार नहीं मानेंगे' हे गाणे गायले आहे.

Last Updated : May 5, 2020, 12:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details