मुंबई - बॉलिवूडशी संबंध तोडणारी 'दंगल गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायरा वसीम अनेकदा कॉन्ट्राव्हर्सीने घेरली जाते. यावेळी तिच्याशी संबंधित कॉन्ट्राव्हर्सी देशातील अनेक भागात झालेल्या प्राणघातक टोळ हल्ल्याशी संबंधित आहे. या माजी अभिनेत्रीने तिच्या ट्विटर हँडलवरील टोळ हल्ल्याविषयी एक ट्विट केले होते, ज्यात तिने त्यामागचे कारण अल्लाहचा कहर असल्याचे म्हटले होते.
जायराने ट्विटरवर कुराणचे एक पद्य लिहून हा हल्ला एक इशारा असल्याचे सांगत, हा अल्लाहचा कहर असल्याचे लिहिलंय. तिने लिहिलंय, 'आम्ही त्यांना पूर आणि फडशाळे, उवा, बेडूक आणि रक्त पाठविले. ही स्वतः ची निशाणी आहे. परंतु ते घमेंडीमध्ये मग्न होते, ज्यांनी पाप केले. कुरआन 7:133.'