महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कंगना म्हणते, बॉलिवूडमध्ये गुणवत्तेची किंमत नाही

सुरुवातीला बॉलिवूडमध्ये आले तेव्हा मला वाटलं, तुमचं टॅलेंटच सर्वकाही असतं, यामुळेच तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. यासाठी मी खूप प्रयत्न केले. मात्र, नंतर मला ही गोष्ट जाणवली, की इथे टॅलेंटची काहीही किंमत नाही.

By

Published : Aug 11, 2019, 9:27 PM IST

कंगना रनौत

मुंबई- सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असणारी आणि तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकवणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतनं म्हटलं आहे, की बॉलिवूमध्ये गुणवत्तेची किंमत नाही. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तिनं बॉलिवूड फक्त ओळखीवर आणि मोठ्या लोकांवर चालत असल्याचा दावा केला आहे.

सुरुवातीला बॉलिवूडमध्ये आले तेव्हा मला वाटलं, तुमचं टॅलेंटच सर्वकाही असतं, यामुळेच तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. यासाठी मी खूप प्रयत्न केले, स्क्रीप्टराइटींग आणि चित्रपटाची निर्मिती करण्यासदेखील सुरुवात केली. मात्र, नंतर मला ही गोष्ट जाणवली, की इथे टॅलेंटची काहीही किंमत नाही.

जे लोक पॉवर पॉलिटीक्स खेळतात त्यांनी स्वतःचेच एक जाळे निर्माण केले आहे आणि हे सगळे एकत्र मिळून काम करतात, असं म्हणत तिनं स्टाकिड्सच्या पदार्पणावरही भाष्य केलं. दरम्यान कंगनाने 'गँगस्टर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या 'मणिकर्णिका', 'क्रिश ३', 'तनु वेड्स मनु' आणि 'क्वीन'सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details