मुंबई - सध्या रणवीर सिंग खूप चर्चेत आहे. गल्ली बॉयला मिळालेल्या यशानंतर तो कबीर खानच्या ८३ चित्रपटात काम करीत आहे. भारताने १९८३ मध्ये जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकाची कथा यात पाहायला मिळणार आहे. रणवीर कपील देव यांची भूमिका साकारत आहे.
१९८३ मध्ये कपील देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने क्रिकेटचा विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला होता. या चित्रपटात सुनिल गावसकर यांची भूमिका कोण साकारणार ही गोष्ट गुलदस्त्यात होती. ही भूमिका ताहिर राज भसीन साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.