मुंबई - अभिनेता प्रतीक बब्बर एक दशकापेक्षा अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत आहे. चित्रपट व्यवसायातील प्रवास हा अनेक चढउतारांनी भरलेला असल्याचे तो म्हणतो.
प्रतीकने २००८ मध्ये 'जाने तू या जाने ना' या रोमँटिक चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तो 'धोबी घाट', 'आरक्षण', 'एक दिवाना था', 'बागी २', 'मुल्क', 'छिछोरे' आणि 'मुंबई सागा' या चित्रपटांमध्ये दिसला.
बॉलिवूडमधील आपल्या १३ वर्षाच्या प्रवासाविषयी बोलताना प्रतीकने सांगितले की, “हा प्रवास रोलरकोस्टर राइडसारखा झाला आहे. बरेच चढ-उतार आले आहेत, परंतु आतापर्यंत बरेच चांगले घडले आहे.''