महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मनोरंजनसृष्टीत लॉकडाऊननंतर लगीनघाई.. 'हे' सेलेब्रिटी चढले बोहल्यावर - मनोरंजन विश्वात लघीनघाई

गेले वर्ष सर्वात काळे वर्ष म्हणून ओळखले जाईल आणि ज्यांचे त्यावर्षी लग्न व्हायचे होते त्यांच्यासाठी तर काळेकुट्ट. कोरोना विषाणूचा जगभर संचार आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची अनिवार्यता. त्यामुळे अनेक लग्न पुढे ढकलली गेली. मात्र आता लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्याने अनेक कलाकारांनी आपले शुभमंगल उरकून घेतले.

post lockdown celebrity weddings
post lockdown celebrity weddings

By

Published : Jan 25, 2021, 2:08 AM IST

Updated : Jan 25, 2021, 5:08 AM IST

मुंबई -रविवार २४ जानेवारीला बॉलिवूड अभिनेता वरुण धवन बोहल्यावर चढला. त्याचे त्याची बऱ्याच वर्षांची गर्लफ्रेंड नताशा दलाल सोबत शुभमंगल झाले. खरंतर त्याला अनुष्का-विराट, रणवीर-दीपिका प्रमाणे परदेशात लग्नसोहळा भरवायचा होता व त्यादृष्टीने तयारीही सुरु होती, परंतु गेल्या वर्षी आलेल्या कोरोना महामारीमुळे त्या सर्वावर पाणी फेरले गेले. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही त्यामुळे ‘अजून किती थांबायचं’ आसा विचार करत त्याने अलिबाग येथील एका आलिशान रिसॉर्टमध्ये लग्न केले. मोजकेच लोक एकत्र येण्याच्या अटींमुळे लग्नाला जवळचे नातेवाईक व मित्रमैत्रिणी आदि उपस्थित होते. २६ तारखेला वरुण मुंबईत मोठे रिसेप्शन ठेवणार आहे, जेणेकरून बॉलिवूडकरांना त्याला आशीर्वाद देण्याची संधी मिळेल.

वरुण नताशा
गेले वर्ष सर्वात काळे वर्ष म्हणून ओळखले जाईल आणि ज्यांचे त्यावर्षी लग्न व्हायचे होते त्यांच्यासाठी तर काळेकुट्ट. कोरोना विषाणूचा जगभर संचार आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची अनिवार्यता. लग्न तर लांबची गोष्ट झाली, साधे भेटायचे पण वांदे झालेले. लॉकडाऊनमुळे सर्व यातायात बंद आणि कर्फ्यूमुळे घराबाहेर पडण्याची पण पंचाईत. हल्ली लग्न ‘सोहळा’ हा खरोखरीच ‘इव्हेंट’ झालाय. ज्यांची लग्ने आधीच ठरली त्यांना ती पुढे ढकलावी लागली. परंतु लॉकडाऊनचे नियम थोडे शिथिल झाल्यावर बऱ्याच जणांनी, पन्नास लोकांत तर पन्नास लोकांत म्हणत साधेपणाने लग्न उरकून घेतले. यात बऱ्याच सेलिब्रिटीज देखील मोडतात. आता नवीन वर्षी दणक्यात सेलिब्रिटी-लग्न होऊ लागलीत व शासनाने भले अजूनही काही निर्बंध लागू ठेवलेले असले तरी ‘आता बास झालं ...’ म्हणत सगळीकडे लगीनघाई सुरु झाली व बरीच लग्न पार पडली.
अभिनेत्री मिताली मयेकर व सिद्धार्थ चांदेकरच
गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात हे सेलिब्रिटी चढले बोहल्यावर -

गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात अनेक सेलिब्रिटीज बोहल्यावर चढल्या. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिने रोहनप्रीत सिंग बरोबर लग्न केले. खरंतर ज्या सिंगिंग रियालिटी शोची ती जज होती, रोहन त्याच शोमध्ये स्पर्धक होता. पण म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात! प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटासाठी आवाज देणाऱ्या उदित नारायण यांचे सुपुत्र आदित्य नारायण झा याने अभिनेत्री श्वेता अगरवालसोबत सात फेरे घेतले. त्या दोघांची भेट एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती. त्या चित्रपटाचे नाव होते ‘शापित’, परंतु या आदित्य-श्वेता जोडीला कोणाची नजर ना लागो. ‘बाहुबली’ मध्ये भल्लालदेव साकारणारा राणा डग्गुबाती हा देखील मिहिका बजाज सोबत लग्नबंधनात अडकला. ती एक इंटिरियर डिझायनर आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत राणाने पहिले लग्न केले होते परंतु दोघांनी घटस्फोट घेतला.

अभिनेत्री अभिज्ञा भावे ने मेहुल पै सोबत लग्नगाठ बांधली
तसेच, गेल्या वर्षी अभिनेत्री गौहर खान व झैन दरबारी यांचा निकाह झाला. झैन संगीतकार इस्माईल दरबारी यांचा मुलगा असून गौहर बिग बॉस ७ मधील विनर होती व २०२० च्या १४ च्या सिझनमध्ये ‘मेंटॉर’ च्या भूमिकेत झळकली होती. हिंदी व प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपटांत वावरणारी काजल अगरवाल ने गौतम किचलू सोबत लग्न केले आणि कोरियोग्राफर-अभिनेता पुनीत पाठक चे निधी मुनी सिंग सोबत शुभमंगल झाले. त्याचप्रमाणे टेलिव्हिजन कलाकार पूजा बॅनर्जीचे कुणाल वर्मा आणि नीती टेलर चे परीक्षित बावा सोबत लग्न झाले.
अभिनेत्री मानसी नाईकचा नुकताच बॉक्सर प्रदीप खरेरा सोबत विवाह संपन्न झाला

मराठी कलाकारांचेही शुभमंगल सावधान -


या सर्व गदारोळात आपली मराठी मनोरंजनसृष्टीही मागे नव्हती. लॉकडाऊनपश्चात मराठी कलाकारही बोहल्यावर चढले. गेल्या वर्षीच कार्तिकी गायकवाड, जी सारेगामापा मराठी लिटिल चॅम्प्स ची विजेती होती, रोहन पिसे सोबत विवाहबंधनात अडकली. याच वर्षी अभिनेत्री अभिज्ञा भावे ने मेहुल पै सोबत लग्नगाठ बांधली. हे अभिज्ञाचे दुसरे लग्न. तसेच बहारदार नृत्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मानसी नाईकचा नुकताच बॉक्सर प्रदीप खरेरा सोबत विवाह संपन्न झाला. तसेच मराठी मनोरंजसृष्टीतील आशुतोष कुलकर्णीचे रुचिका पाटील सोबत तर अभिनेत्री प्राजक्ता परबचे अंकुश मरोदे सोबत लग्न झाले.

अभिनेत्री मिताली मयेकर ने सिद्धार्थ चांदेकरच्या गळ्यात वरमाला घातली
रविवारी, २४ जानेवारी २०२१ ला, जेव्हा वरुण धवन नताशाला वरमाला घालत होता त्याचवेळी मराठी अभिनेत्री मिताली मयेकर ने सिद्धार्थ चांदेकरच्या गळ्यात वरमाला घातली. ढोलताशाच्या गजरात गेले चार दिवस त्यांच्या लग्नाआधीचे विधी, हळद, मेहंदी, संगीत इत्यादी सुरु होते.
Last Updated : Jan 25, 2021, 5:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details