नवी दिल्ली - संपूर्ण भारत वर्ष आज भारतीय स्वातंत्र्याचा ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहे. देशप्रेमाने ओतप्रत भरलेल्या बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत
सर्वप्रथम, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांनी ट्विटर हँडलवरुन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 84 वर्षीय धर्मेंद्र यांनी मोहम्मद रफी यांनी गायलेल्या 'कर चले हम फिदा' या देशभक्तीपर गीताची एक छोटी क्लिप शेअर केली.
दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर हात जोडलेले कोलाज चित्र शेअर केले. चित्रात तिरंगा रंगला असून वैद्यकीय व्यावसायिकांची प्रतिनिधीक प्रतिमा त्यात दिसून येते. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांनी देशाचा अभिवादन करतांना, बच्चन यांनी कोरोना व्हायरस साथीच्या आजाराविरूद्ध लढणार्या "खऱ्या योद्धा" च्या प्रयत्नांचाही आवर्जुन उल्लेख केला.
"महामारीविरूद्ध लढाईतील खऱ्या योद्ध्यांनी सलाम .. आणि या शुभ दिनाच्या निमित्ताने शांतता व सुसंवादासाठी शुभेच्छा .." असे त्यांचनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सदाबहार गायिका लता मंगेशकर यांनीही या शुभेच्छा दिवशी देशाला शुभेच्छा दिल्या आणि ट्विटरवर ‘सारे जहां से अच्छा’ या देशभक्तीपर गीताची लिंक दिली.
ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी शनिवारी ट्विटरवर व्हिडिओ संदेशाद्वारे देशातील नागरिकांना 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सलमान खाननेही स्वातंत्र्यदिनी संगीतमय श्रद्धांजली वाहिली. दबंग अभिनेत्याने मुहम्मद इक्बाल यांच्या 'सारे जहां से अच्छा' या प्रसिद्ध कवितेचा तुकडा शेअर केला. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना सलमान खानचा मेहुणा अतुल अग्निहोत्रीने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.
ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनीही इंस्टाग्रामवर त्यांचे एक छायाचित्र शेअर केले आहे यात ते एक वृत्तपत्र वाचताना दिसत आहे आणि त्यावर "हॅपी इन्डेपेन्डन्स डे" लिहिलेलं आहे.
तर क्वीन अभिनेत्री कंगना रनौतने खास दिवशी वृक्ष लावण्यासाठी पाऊल उचलले. अभिनेत्रीच्या टीमने ट्विटरवर तिचा एक फोटो पोस्ट केला आहे, यात ती गुलाबी रंगाच्या साडीमध्ये वृक्षारोपन करताना दिसत आहे.
संगीतकार ए.आर. रहमान यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे ७४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा जनतेला दिल्या आहेत. प्रेम व माणुसकी जपण्याचे आवाहन त्यांनी यातून केलंय.
यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला कोरोना व्हायरसच्या साथीच्या आजाराची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे हा सोहळा वेगळ्या पध्दतीने आयोजीत केला जात आहे. सामाजिक अंतराचे निकष डोळ्यासमोर ठेवून व्यवस्था केली आहे.