महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

चौकशीसाठी चालत आलेल्या बिहार पोलिसांना परत जाण्यासाठी अंकिता लोखंडेने दिली लग्झरी कार - सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री अंकिता लोखंडेची चौकशी करण्यासाठी बिहार पोलीस तिच्या घरी चालत गेले होते. त्यांना परतताना पुन्हा लांबपर्यंत चालावे लागू नये यासाठी अंकिताने आपली गाडी देऊ केली. तिच्या जग्वार या लग्झरी गाडीतून चार जणांची पोलीस टीम आपल्या पुढील कामासाठी रवाना झाली.

Ankita Lokhande offers her Jaguar to drop off Bihar cops
बिहार पोलिसांना परत जाण्यासाठी अंकिता लोखंडेने दिली लग्झरी कार

By

Published : Aug 1, 2020, 12:54 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलीस मुंबईत आले आहेत. अंकिता लोखंडेचा जबाब नोंदवण्यासाठी गेलेल्या या पोलीस पथकाला परतण्यासाठी अंकिताने आपली गाडी देऊ केली. तिच्या जग्वार या लग्झरी गाडीतून चार जणांची पोलीस टीम आपल्या पुढील कामासाठी रवाना झाली.

बिहार पोलीस पथकाला अंकिता लोखंडेच्या घरी चौकशीसाठी जायचे होते. मालाडमध्ये तिच्या घरापासून हे पोलीस तीन किलोमिटर दूर होते. सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीमुळे सर्वत्र शुकशुकाट होता. वाहने मिळत नव्हती. टॅक्सी आणि ऑटोरिक्षा उपलब्ध नव्हत्या. विशेष म्हणजे बिहार पोलिसांच्या टीमला मुंबई पोलिसांनी कोणत्याही वाहनाची मदत केलेली नाही.

बिहार पोलिसांना परत जाण्यासाठी अंकिता लोखंडेने दिली लग्झरी कार

अंकिताच्या घरी जाण्यासाठी बिहार पोलिसांच्या या पथकाला तीन किलोमीटर चालत जावे लागले, असे या अहवालात म्हटले आहे. ही चौकशी सुमारे एक तास चालली, त्यानंतर त्यांना लांबपर्यंत चालत जावे लागू नये यासाठी अंकिताने पोलिसांसाठी आपल्या जग्वार गाडीची ऑफर दिली.

अंकितासाठी पोलिसांच्या पथकात जवळपास 30 प्रश्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. तिने जे सांगितले त्यासंबंधीचा तपशील अद्याप समोर आला नाही.

हेही वाचा - माझ्या भावाला न्याय द्या.. सुशांतच्या बहिणीची पंतप्रधान मोदींकडे याचना

चार जणांच्या पोलीस पथकाने आतापर्यंत अनेक जाणांचे जबाब नोंदवले असून यात अंकिता आणि सुशांतच्या बहिणीचाही समावेश आहे. परंतु, रिया चक्रवर्तीबद्दल अधिक समजू शकले नाही. बिहार पोलिसांची टीमही गुरुवारी तिच्या फ्लॅटवर गेली होती पण ती तेथे नव्हती.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “कुठेही काही घडत नाही. आम्ही या संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहोत. रिया सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. प्रकरण मुंबईच्या हद्दीत आणले पाहिजे, असे तिच्या याचिकेत म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत या प्रकरणात काहीही करता येणार नाही."

अधिकारी म्हणाले, की बिहार पोलिसांचे पथक मुंबईत आपले काम सुरूच ठेवेल. परंतु, मुंबई पोलिसांकडून अजिबात सहकार्य मिळत नसल्याने यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details