'तान्हाजी दि अनसंग वोरियर' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. या सिनेमातील काही सीन्सवर राष्ट्रवादी काँगेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि संभाजी ब्रिगेड यांनी काही आक्षेप घेतले आहेत. मात्र काल झालेल्या पत्रकार परिषदेत सिनेमातील मुख्य अभिनेता आणि निर्माता अजय देवगण आणि सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत यांनी आपलं म्हणणं मांडलं होतं.
अजय देवगण यांच्या करिअरमधील हा 100 वा सिनेमा असल्याने त्यात चांगली भूमिका करण्यासोबतच ऐतिहासिक बाबतीत कोणतीही चूक राहू नये यासाठी जास्त प्रयत्न केल्याचं त्याने कालच स्पष्ट केलं होतं. सिनेमात दाखवलेली प्रत्येक गोष्ट ही ऐतिहासिक तथ्य पडताळून मगच प्रेक्षकांसमोर आणली असल्याच त्याने सांगितलं. त्यासोबतच सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत यानेही या सिनेमावर लेखक प्रकाश कपाडिया यांनी भरपूर मेहनत घेतली होती. तसच अनेक पुस्तकं आणि अनेक ऐतिहासिक चित्र यांची सांगड घालून मगच हा सिनेमा तयार केलेला असल्याने त्यातून कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली होती.