महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कंगनाचा वाचाळपणा सुरुच; पीओके म्हटल्यानंतर आता मुंबईची तुलना तालिबानशी - कंगनाचा वाचाळपणा सुरूच,

कंगना रणौतला मुंबईत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटल्यानंतर कंगनाने आपले मत व्यक्त केले आहे. यात तिने मुंबईची तुलना तालिबानशी केली आहे..

Kangana
कंगना रनौत

By

Published : Sep 4, 2020, 7:16 PM IST

मुंबई- कंगना रणौतला मुंबईत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले होते. त्यानंतर कंगनाने दिलेल्या प्रतिक्रियेत तिने मुंबईची तुलना तालिबानशी केली आहे.

''बरेच लोक मला परत मुंबईला न येण्याची धमकी देत ​​आहेत. म्हणून मी आता येत्या आठवड्यात मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे, जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा मी वेळ पोस्ट करते. किसी के बाप में हिम्मत है तो रोक ले.''असे ट्विट कंगनाने केले होते.

"संजय राऊत यांनी मला मुंबईत परत न येण्यास सांगितले आहे,' आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?" असे कंगनाने गुरुवारी ट्विट केले होते .

कंगना सध्या तिच्या गावी मनाली येथे आहे. कोरोना संसर्गानंतर लागू झालेल्या लॉकडाऊनपासून ती आपल्या कुटुंबीयांसोबत राहत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details