महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आमीर खान, किरण राव यांच्या 'पानी फाऊंडेशन'ला मिळाला जागतिक सन्मान - watershed development news

ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक एंड्रयू मिलिसन यांनी अलीकडेच आमीर खान आणि किरण राव यांच्या 'पानी फाऊंडेशन'वर एक एपिसोड आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध केला आहे. पाणलोट व्यवस्थापनावरील काम समजून घेण्यासाठी एंड्रयू यांनी महाराष्ट्रातील एका गावाला भेट दिली होती. पृथ्वीवरील सर्वात मोठा पर्माकल्चर प्रकल्प म्हणून त्यांनी 'पानी फाऊंडेशन'चा गौरव केला.

'Pani Foundation' gets world honor
'पानी फाउंडेशन'ला मिळाला जागतिक सन्मान

By

Published : May 20, 2020, 7:41 PM IST

मुंबई - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रख्यात डिझाइनर आणि ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक एंड्रयू मिलिसन यांनी अलीकडेच आमीर खान आणि किरण राव यांच्या 'पानी फाऊंडेशन'वर एक एपिसोड आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध केला आहे. पाणलोट व्यवस्थापनावरील काम समजून घेण्यासाठी एंड्रयू यांनी महाराष्ट्रातील एका गावाला भेट दिली होती.

'पानी फाउंडेशन'ला मिळाला जागतिक सन्मान

'पानी फाऊंडेशन'तर्फे आयोजित वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावकऱ्यांनी केलेले काम पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि पृथ्वीवरील सर्वात मोठा पर्माकल्चर प्रकल्प म्हणून त्यांनी याचा गौरव केला. त्यांनी त्यावर एक लघुपटही बनवला असून तो आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध केला आहे. 'पानी फाऊंडेशन' ही एक ना-नफा संस्था असून टिकाऊ वातावरणासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्यातील दुष्काळनिवारण व पाणीव्यवस्थापन या क्षेत्रांत ही संस्था काम करते.

'पानी फाउंडेशन'ला मिळाला जागतिक सन्मान

आमीर खान, किरण राव, रीना दत्ता आणि सत्यजित भटकळ यांनी या संस्थेची स्थापना केली असून 'पानी फाऊंडेशन'चा उद्देश राज्यभरातील अनेक गावांचा पाणीपुरवठा पूर्ववत करणे हा आहे. पर्माकल्चर म्हणजे शेतीला टिकाऊपणा आणि स्वावलंबित्व प्रदान करण्यासाठी पर्यावरणीय प्रणालींचा विकास करणे. जीवनातील सद्भावासहित निसर्गाकडे पाहण्याचा हा एक समग्र दृष्टीकोन आहे आणि पारंपरिक तंत्राच्या अवलंबाचे मुख्य उद्दीष्ट आपल्याला स्वयंनिर्माता बनवते. जगातील सर्वात मोठा पर्माकल्चर प्रकल्प म्हणून एंड्रयूने याचे अगदी योग्य मूल्यांकन केले असून आमीरच्या दुष्काळमुक्त आणि टिकाऊ गावांच्या दृष्टीकोनाजवळचे ते एक पाऊल आहे. 'पानी फाऊंडेशन'ने गावकऱ्यांना पाणलोट व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे, ज्याद्वारे गावकऱ्यांनी एक संयुक्त आघाडी उघडून संपूर्ण जलाशयात पाण्याची पातळी वाढवण्यासाठी स्पिलवेची निर्मिती केली, ज्यामुळे गावचा पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. याचा परिणाम आश्चर्यकारक होता, ज्यामुळे हा प्रकल्प सर्वात फलदायी झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details