महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

India-China Relation : भारताचे चीनसोबतचे संबंध 'खूप कठीण टप्प्यातून' जात आहेत - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर - परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर

युक्रेनवरुन नाटो देश आणि रशिया यांच्यातील वाढत्या तणावावर चर्चा करण्यासाठी म्युनिक सुरक्षा परिषदेत (MSC) परराष्ट्र मंत्रालयाचे मंत्री एस. जयशंकर यांनी सहभाग घेतला होता. या परिषदेत बोलताना त्यांनी चीन आणि भारत संबंधावर भाष्य केले.

India-China Relation
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

By

Published : Feb 20, 2022, 1:17 PM IST

म्युनिक - परराष्ट्र मंत्रालयाचे मंत्री एस. जयशंकर यांनी ( External Affairs Minister S Jaishankar on India-China Ties ) शनिवारी चीन आणि भारत संबंधावर भाष्य केले. सीमा कराराचे उल्लंघन केल्याने सध्या भारत आणि चीनचे संबंध हे फार कठीण टप्प्यातून जात आहेत, असे जयशंकर म्हणाले. सीमेची स्थिती ही दोन्ही देशांमधील संबंधांची स्थिती निश्चित करेल, असेही त्यांनी अधोरेखित केले. म्युनिक सुरक्षा परिषद (MSC) 2022 ला ते संबोधित करत होते. युक्रेनवरुन नाटो देश आणि रशिया यांच्यातील वाढत्या तणावावर चर्चा करण्यासाठी म्युनिक सुरक्षा परिषदेत (MSC) जयशंकर यांनी सहभाग घेतला होता.

सीमेवर किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्करी फौजा तैनात न करण्याचा चीनशी करार होता. पण चीनने त्या करारांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे साहजिकच, सीमेची स्थिती संबंधांची स्थिती निश्चित करेल, असे त्यांनी म्हटलं.

भारताचे 20 जवान शहीद -

15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारतीय सैन्यदलाचे 20 जवान शहीद झाले होते. भारत-चीन सैन्यादरम्यानचा गेल्या चार दशकांतील हा सर्वात हिंसक तणाव असल्याचे यानंतर सांगितले गेले. भारताने या घटनेनंतर लगेचच आपले सैनिक शहीद झाल्याची माहिती जारी केली होती. मात्र चीनने याविषयी कसलिही अधिकृत माहिती जारी केलेली नव्हती. मात्र, काळी काळानंतर चीनने आपले जवान ठार झाल्याची कबुली देत जवानांची माहितीही सार्वजनिक केली होती. दरम्यान, 10 फेब्रुवारी रोजी प्रकाशित केलेल्या एका वृत्तात रशियन वृत्तसंस्था टासने गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत चीनचे 45 जवान ठार झाल्याचे म्हटले होते.

हेही वाचा -Kidnapping of fishermen from Pakistan : पाकिस्तानकडून 30 भारतीय मच्छिमारांचे 5 बोटींसह अपहरण

ABOUT THE AUTHOR

...view details