इस्लामाबाद - पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये आपले नाक खुपसले आहे. भारत बर्फाळ प्रदेश सियाचीन हा पर्यटनासाठी खुला करु शकत नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटले आहे.
भारताकडून सद्भावनाची अपेक्षा केलीच जाऊ शकत नाही. भारत सियाचीन हा प्रदेश पर्यटनासाठी खुला करु शकत नाही. कारण, भारताने या प्रदेशावर जबरदस्तीने ताबा मिळावला असून सियाचीन हा वादग्रस्त प्रदेश आहे. आम्ही नेहमीच भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे, असा फैसल यांनी म्हटले आहे.