महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

श्रीलंकेशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध... - भारत श्रीलंका आणि चीन

अनेक दशकांपासून भारत मोठ्या भावाची भूमिका बजावत श्रीलंकेला सहाय्य करत आला असला तरीही, २००५ मध्ये महिंद्रा राजपक्षे श्रीलंकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यापासून, कोलंबो बिजींगच्या नजीक जात आहे.

श्रीलंकेशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध...
श्रीलंकेशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध...

By

Published : Dec 4, 2019, 12:02 PM IST

शेजारच्या श्रीलंकेशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध हे रामसेतूच्या काळापासून इतके प्राचीन आहेत. देशाची १२ टक्के तामिळ लोकसंख्या आणि देशाची एकता आणि एकात्मिकता यांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय शांतिसेनेने केलेला त्याग यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील बंध आणखी पक्के झाले आहेत.


तामिळ वाघांच्या दहशतवादावर विजय मिळाल्यानंतर, राजपक्षे यांना आपल्याला कुणी विरोधक नाहीत, याचा विश्वास वाटू लागला. पण २०१५ मध्ये त्यांनी आपल्या पराभवासाठी भारताला दोष दिला.


महिंद्रा राजपक्षे यांचे बंधु गोताबाया राजपक्षे यांचा नुकत्याच श्रीलंकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत झालेला विजय आणि महिंद्रा यांची देशाच्या पंतप्रधानपदी झालेली नियुक्ती यामुळे दिल्ली आणि कोलंबो यांच्यातील संबंधांबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहेत. पण वास्तव ओळखून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या माध्यमातून गोताबाया यांच्या शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी दिलेले निमंत्रण आ सणि श्रीलंकेच्या अध्यक्षांची भारत भेट यामुळे राजकीय वातावरण स्वच्छ झाले आहे.


द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा इरादा जाहीर करून, गोताबाया यांनी, भारताची सुरक्षा धोक्यात येईल, असे काही करण्याची आपली इच्छा नाही, असे स्पष्ट केले आणि सर्व शंका आणि गैरसमज दूर केले. आपल्या देशातील चीनी गुंतवणुकीला भारत आणि इतर देशांनी पर्याय दाखवावा, अशीही त्यांची इच्छा होती.


दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी ३६० कोटी रूपयांच्या मदतीचे आश्वासन आणि २८७० कोटी रूपयांचे कर्ज, यासह भारताने जुन्या संबंधांचे स्थिरपणे पुनरूज्जीवन करून मजबूत करण्याची वेळ आली आहे.


पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत श्रीलंकेच्या समाजातील विविध थरांना वाटणाऱ्या भीतीचा आरसा दिसला. गेल्या वर्षी माजी अध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी देशाला असुरक्षित करून तसेच देशाची संरक्षण व्यवस्था कमजोर करून राजकीय पेचप्रसंग निर्माण केला.


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे विक्रमसिंघे पंतप्रधान झाले असले तरीही. ईस्टर डेच्या दिवशी झालेल्या भयानक बाँबस्फोटांनी संपूर्ण देशाला औदासिन्यात ढकलले. संसदीय निवड समितीने भारत आणि अमेरिकेने बांबहल्ले होण्याचा इषारा दिला होता, त्यानंतरही सुरक्षा यंत्रणांनी निष्क्रीयता दाखवल्याबद्दल दोष दिला आहे.


सिंहला बहुसंख्यांकांना गोताबाया हेच नव्याने उदयास येत असलेल्या आयएस दहशतवाद चिरडून टाकण्यासाठी योग्य व्यक्ती आहेत, असा विश्वास वाटतो. उत्तर आणि पूर्वेकडील प्रांतातील तामिळ आणि मुस्लीम बहुसंख्यांकांची पसंती गोताबाया यांचे प्रतिस्पर्धी साजिथ प्रेमदासा यांना आहे. कारण दहशतवाद नियंत्रणात आणण्याच्या नावाखाली त्यांना आपल्या सुरक्षेवर गदा येईल, याची भीती वाटते.


गोताबाया यांनी सिंहला बहुसंख्यांकांच्या मतांवर अध्यक्षीय निवडणूक जिंकली असली तरीही ते तामिळांच्या आकांक्षा आणि भारताशी जो त्यांचा समर्थक आहे, त्यांच्याशी संबंधांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. देशाच्या दक्षिणेकडील भागातील लोक संघराज्य शब्दाला घाबरतात तर उत्तरेकडील रहिवासी प्रशासनाच्या केंद्रीकृत स्वरूपाला विरोध करतात.


मैत्रीपाल,ज्यांनी सर्वांना स्वीकारार्ह होईल, अशी व्यवस्था आणण्याचा आव आणला तरीही, शेवटी त्यांनी काहीच केले नाही. गोताबाया यांचे म्हणणे असे आहे की, १९८७ मध्ये केलेल्या घटनेच्या १३ व्या दुरूस्तीनुसार, तामिळबहुल प्रांतांकडे पूर्ण अधिकार हस्तांतरित करणे हे बहुसंख्यांकांच्या(सिंहला) इच्छेविरूद्ध शक्य नाही आणि आपण एकात्मिक विकासावर लक्ष केंद्रित करू.


गोताबाया यांच्या राजवटीसमोर मुख्य आव्हान हेच आहे की, त्यांना दीर्घकालापासूनची ही समस्या नव्या पेचप्रसंगाकडे घेऊन जाणार नाही, हे पहावे लागेल. २५ वर्षे एलटीटीई दहशतवादामुळे यातना सहन कराव्या लागलेल्या देशासाठी, देशांतर्गत आयएसचा दहशतवाद हा आणखी एक अनपेक्षित झटका आहे.


ईस्टर डेच्या दिवशी झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याच्या परिणामी, देशाच्या एकूण उत्पन्नापैकी ५ टक्के उत्पन्न ज्या पर्यटन व्यवसायातून येते, त्या पर्यटन व्यवसायाचे जोरदार नुकसान झाले आहे.

श्रीलंकेसाठी हा काळजीचा मुद्दा आहे. २०१६ मध्ये मैत्रीपाल यांच्या राजवटीत ४.५ टक्के असलेला विकासाचा दर, आज २.५ टक्के इतका १८ वर्षांतील नीचांकी स्तरावर उतरला आहे. यात भर म्हणून, जीडीपीच्या ७५ टक्के इतका कर्जाचा बोजा अवघड परिस्थिती निर्माण करत आहे.


चीनला आपल्या विस्तारवादासाठी ही योग्य संधी आहे. महिंद्रा राजपक्षे यांच्या राजवटीत, चीननेश्रीलंकेत वीजकेंद्र, बंदरे, विमानतळ आणि उत्तर ते दक्षिणेपर्यंत रस्ते आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधा सुरू करण्याची कंत्राटे मिळवली आणि आता तर श्रीलंकेच्या किनारपट्टीवर आपली पाणबुडी ठेवण्याच्या अवस्थेला पोहचला आहे.


गोताबाया चीन आणि भारत यांच्यापासून समानांतर राखण्याचा प्रस्ताव देत असले तरीही, श्रीलंकेत गुंतवणूक करण्यासाठी इतर देशांनी स्वारस्य दाखवले नाही तर चीन बेल्ट अँड रोड पुढाकाराचा फायदा उठवून आणखी आतपर्यंत घुसखोरी करण्याची दाट शक्यता आहे.

आम्ही स्वतःच थेट परकीय गुंतवणुकीला निमंत्रण देत आहोत, तेव्हा भारतासाठी श्रीलंकेला मदत करणे अवघड आहे. परंतु तामिळांच्या हितासाठी आणि श्रीलंकेच्या दीर्घकालीन लाभासाठी, भारताने श्रीलंकेबरोबरचे द्विपक्षीय संबंध सकारात्मक मजबूत केले पाहिजेत.

ABOUT THE AUTHOR

...view details