वॉशिंग्टन - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. यातच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संबंध खूपच भयानक स्थितीत असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
या स्थितीला भारत आणि पाकिस्तानमध्ये खूपच भयानक स्थिती आहे, दोन्ही देशातील वातावरण फारच बिघडले आहे. ही तणावाची परिस्थिती लवकरच समाप्त व्हावी. आमचे सरकार दोन्ही देशांच्या संपर्कात असून लवकर काश्मीर खोऱ्यात शातंता प्रस्थापित होण्याची आशा आहे. खूप साऱ्या लोकांना प्राण गमावावे लागले आहेत. हे आता थांबले पाहिजे यासाठी आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, असे ट्रम्प म्हणाले.
भारत कठोर भूमिका घेणार