महाराष्ट्र

maharashtra

actors leaving the Tarak Mehta show : तारक मेहता...शो सोडलेल्यांचे पैसे थकले? निर्मात्यांनी सोडले मौन, म्हणाले, 'कलाकारांचे कष्टाचे पैसे...'

By

Published : Feb 15, 2023, 11:35 AM IST

तारक मेहता का उल्टा चष्मा शोमधून कलाकार बाहेर पडत असल्यामुळे अनेक बातम्या पसरत आहेत. त्यापैकी एक म्हणजे कलाकारांचे मानधन थकल्यामुळे कलाकार शो सोडत आहेत. शोचे निर्माता असित मोदी यांनी या बातम्यांचे खंडन केले व इश्वरांने आपल्याला भरपूर दिले असल्याचे सांगितले.

actors leaving the Tarak Mehta show
actors leaving the Tarak Mehta show

मुंबई- तारक मेहता का उल्टा चष्मा टीव्ही मालिकेची चर्चा नेहमी होत असते. मध्यंतरी या मालिकेतील अनेक कलाकार शो सोडून निघून गेले. अलिकडे याबाबत अशी चर्चा रंगत होती की मालिकेच्या निर्मात्यांनी कालाकारांचे पैसे बुडवले म्हणून कलाकार नाराज झाले आणि त्यांनी शो सोडला. अलिकडेच या शोमधील टप्पू राज अनादकटने शोला राम राम ठोकला होता. या कार्यक्रमातून बाहेर पडलेल्या शैलेश लेश लोंढा यांनीही हा शो पैसे न मिळाल्यामुळे सोडल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. या बातम्या झळकल्यानंतर तारक मेहता..शोचे निर्माता असित मोदी यांनी मौन सोडले आहे.

कलाकारांच्या मानधनाबद्दल असित मोदी यांचे मत - तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या शुटिंग सेटवर असित मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कलाकारांना मानधन मिळत नसल्याच्या मुद्द्यावर मोदी म्हणाले की, आमच्याकडून पैसे थकवण्यात आल्याची चर्चा कोणीही करत नाही, या सर्व अफवा आहेत. कलाकारांचे कष्टाचे पैसे आमच्या खिशात आम्ही कशाला ठेवू? इश्वराने मला भरपूर दिले आहे, सर्वाधिक प्रेम त्याने मला बहाल केले आहे. मी कलावंतांचे पैसे कशाला रोखू, मला लोकांना हसवण्याची संधी मिळते, यातच मला समाधान आहे.

मालिका सोडणाऱ्यांबद्दल काय म्हणाले असित मोदी? - ज्या कालाकारांनी तारक मेहता शो सोडला त्यांच्याबद्दल मोदी म्हणाले की, हा शो २००८ मध्ये सुरू झाला, आता त्याला १५ वर्षे पूर्ण होत आहेत. या शोमधील व्यक्तीरेखा त्याच आहेत, फक्त काही कलाकार बदलले आहेत. कलाकार का बदलले याच्या तपशीलात मला जायचे नाही, पण मी सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत आलो आहे. आमच्या मालिकेच्या सेटवर कलाकार कधीही भांडत नाहीत किंवा त्यांच्यात कोणताही वाद नाही. मी नेहमी इश्वराला प्रार्थना करतो की माझी ही टीम, मग तो स्पॉट बॉय असो मेकअप मॅन असो, ड्रेस मॅन असो, सर्वजण अबाधित राहो. या सर्वांचे 2008 पासून एक कुटुंब आहे आणि सर्वजण मन लावून एकत्र काम करत असतात.

निर्माता असित मोदी पुढे म्हणाले की, या मालिकेत जर कुणाला काम करायचे नसेल किंवा कुणाला काही अडचण असेल, कुणाला आरोग्याशी संबंधित समस्या असेल किंवा कुणाला त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे असेल, तर आम्हाला ते समजते आणि अशावेळी आम्ही काय करू शकतो. आमच्यामुळे कोणीतरी शो सोडतोय असं अजिबात घडत नाही.

दिशा वाकानी अर्थात दयाबेन कधी परत येणार? - तारक मेहता शोमध्ये दयाबेनच्या पुनरागमनावर असित मोदी म्हणाले की, दिशा वाकानी शोमध्ये आली तर खूप चांगले होईल. पण आता तिचे स्वतःचे एक कौटुंबिक जीवन आहे. ती तिच्या कौटुंबिक जीवनाला प्राधान्य देत आहे, त्यामुळे तिला येणे थोडे कठीण जात आहे. पण आता टप्पू आल्याने दयाबेनही लवकरच येईल अशी आशा आहे. दया भाभीचा तोच धमाल गरबा, दांडिया हे सगळे गोकुळधाम सोसायटीत सुरू होणार आहे. थोडा वेळ थांबा. आता उशीर झालेला नाही. दया भाभी लवकरच दिसणार आहे.

हेही वाचा -Hardik Pandya And Natasha Remarried: हार्दिक पांड्याने नताशा स्टॅनकोविचसोबत केले दुसऱ्यांदा लग्न पाहा फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details