मुंबई :अभिनेता रितेश देशमुखने नुकतीच चित्रपटसृष्टीत २० वर्षे पूर्ण केली. तसेच त्याची निर्मितीसंस्था 'मुंबई फिल्म कंपनी'ला नुकतीच १० वर्षे पूर्ण झाली. बॉलीवूडमध्ये अभिनयक्षेत्रात दशकभर काढल्यानंतर रितेश देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याचवेळी त्याने आपली निर्मितीसंस्थाही काढली. रितेशने 'मुंबई फिल्म कंपनी' (Mumbai Film Company completed 10 years) अंतर्गत त्याचा मराठी पदार्पण चित्रपट 'लय भारी' (Lay Bhari) ची निर्मिती केली. नंतर या निर्मितीसंस्थेच्या बॅनरखाली उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती झाली. त्यांच्या 'यलो' (Yellow Movie) ला ३ राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत.
रितेश देशमुखने मानले आभार : या दशकपूर्ती संदर्भात बोलताना रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व्यक्त होत म्हणाला, मुंबई फिल्म कंपनीला १० वर्षे पूर्ण झाले आहेत. या १० वर्षात ६ यशस्वी चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. लय भारी, येलो, फास्टर फेणे, बालक पालक, माऊली आणि वेड अशा आशयघन चित्रपटांची निर्मिती मुंबई फिल्म कंपनीने (Mumbai Film Company) केली आणि ही फक्त सुरुवात आहे. तुमच्या अफाट प्रेम, आशीर्वाद आणि विश्वासाबद्दल धन्यवाद.