महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'शमशेरा' फ्लॉप म्हणणाऱ्यांवर भडकला संजय दत्त, म्हणाला - "रक्त, घाम आणि अश्रूंनी बनवलाय सिनेमा"

'शमशेरा' चित्रपटाला फ्लॉप म्हणणाऱ्यांना संजय दत्तने सोशल मीडियावर चांगलेच सुनावले आहे. त्याने करण मल्होत्राचा बचाव करताना अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.

By

Published : Jul 28, 2022, 5:23 PM IST

संजय दत्त
संजय दत्त

मुंबई- यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'शमशेरा' हा चित्रपट 22 जुलै रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर अवघ्या पाच दिवसांत या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा ​​यांनी केले आहे. करणने सोशल मीडियावर चित्रपटाच्या अपयशावर एक लांबलचक नोट शेअर केली आहे. या चिठ्ठीत त्याने चित्रपट फ्लॉप झाल्याने दुखावल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी लिहिल्या होत्या. आता या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा संजय दत्तनेही शमशेराच्या फ्लॉपवर मौन सोडले आहे. करणनंतर संजय दत्तनेही सोशल मीडियावर एक लांबलचक नोट शेअर केली आहे.

'शमशेरा'ला फ्लॉप म्हणणाऱ्यांना संजय दत्तने एक चिठ्ठी लिहून म्हटले आहे की, 'चित्रपट ही एक उत्कटतेची कृती आहे, उत्कठता तुम्हाला यापूर्वी कधीही न भेटलेले पात्रं समोर आणते आणि शमशेरा देखील त्या कथेपैकीच एक आहे. हा चित्रपट रक्त, घाम आणि अश्रूंनी बनवला आहे, हे एक स्वप्न आहे, जे आम्ही पडद्यावर आणले आहे. चित्रपट हे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी असतात आणि चित्रपटाला त्याचे प्रेक्षक मिळतातच, मग ते उशीरा मिळतात किंवा लवकर'.

संजयने पुढे लिहिले की, ''शमशेराचा तिरस्कार करणारे अनेक लोकांचा पत्त कळला आहे. काही लोक असे आहेत ज्यांनी चित्रपट पाहिलाही नाही आणि मला याचे वाईट वाटते की लोक आमच्या मेहनतीचा आदर करत नाहीत, चित्रपट निर्माता म्हणून मी करणचे कौतुक करतो. माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत काम केलेल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी तो एक आहे, त्याने त्याच्या पात्रांच्या बाबतीत चमत्कार केले आहेत. 'अग्निपथ'मध्ये त्याने मला कांचा चीनाची भूमिका दिली, त्याची काम करण्याची पद्धत खूपच छान आहे.''

करणची स्तुती करताना संजय पुढे म्हणाला, "करणने माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवला आणि मला शमशेरामध्ये भूमिका दिली आणि मी शुद्ध सिंगची भूमिका केली, करण हा एक कुटुंबासारखा आहे आणि अपयश-विजय बाजूला ठेवून मी त्याच्यासोबत आहे मी उभा आहे. मी संपूर्ण टीमचे आभार मानू इच्छितो. शेवटी संजय म्हणाला, 'बाकी कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना'.

हेही वाचा -'डंकी'च्या सेटवरील शाहरुख आणि तापसी पन्नूचा फोटो लीक

ABOUT THE AUTHOR

...view details