महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Vani Jairam Passes Away : प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांनी व्यक्त केला शोक - वाणी जयराम

प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे शनिवारी चेन्नई येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान मोदींसोबतच देशातील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Vani Jairam Passes Away
वाणी जयराम यांचे निधन

By

Published : Feb 5, 2023, 7:01 AM IST

नवी दिल्ली :प्रसिद्ध गायिका वाणी जयराम शनिवारी चेन्नईतील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वाणी जयराम यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर आवाजांपैकी एक असलेल्या वाणी जयराम यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांना आदरांजली वाहिली आहे. मोदी म्हणाले की, वाणी त्यांच्या सुरेल आवाज आणि समृद्ध कार्यांसाठी नेहमीच स्मरणात राहतील.

मोदींचे ट्विट : वाणी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, वाणी जयराम यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली आहे. त्यांनी वेगवेगळ्या भाषा आणि वेगवेगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या गाण्यांना आपला आवाज दिला. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि चाहत्यांच्या प्रती माझ्या संवेदना आहेत. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनराई विजयन, राज्यमंत्री, राजकीय नेते आणि प्रसिद्ध गायक के.के. एस. चित्रासह इतरांनी वाणी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आरिफ मोहम्मद खान यांनी ट्विट केले की, प्रसिद्ध पार्श्वगायिका आणि पद्मभूषण पुरस्कार विजेत्या वाणी जयराम यांच्या निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांच्या गाण्यांनी मल्याळम आणि इतर भाषांमधील प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला : वाणी जयराम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना केरळचे मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, वाणी जयराम ह्या एक अपवादात्मक प्रतिभावान गायिका होत्या. त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने संगीतप्रेमींच्या हृदयात अतुलनीय स्थान मिळवले आहे. त्यांच्या वेगळ्या मल्याळम उच्चारामुळे त्यांनी कोणालाही आपण केरळमधील आहे असे वाटण्याची संधीही दिली नाही. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत जगताची मोठी हानी झाली आहे.

तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त : 'बोले रे पापीहारा' या लोकप्रिय हिंदी गाण्यासह 19 भाषांमध्ये 10,000 हून अधिक गाणी गायलेल्या प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे शनिवारी चेन्नईत निधन झाले. त्या अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहत होत्या. जयराम यांच्या पतीचे आधीच निधन झाले असून त्यांना मूलबाळ नाही. वाणी जयरामने तीन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले असून तमिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड, हिंदी, गुजराती, ओडिया, मराठी, हरियाणवी, आसामी, तुलु आणि बंगाली अशा १९ भाषांमध्ये १०,००० गाणी गायली आहेत. त्यांचा ओडिशा, तामिळनाडू, गुजरात आणि आंध्र प्रदेश येथील राज्य सरकारने पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे उत्तम ज्ञान : वाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला होत्या. त्यांनी पटियाला घराण्याचे उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्या हातून हिंदुस्थानी संगीताचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपली नोकरी सोडली. जयराम यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे उत्तम ज्ञान होते. तसेच त्यांना हिंदी, गुजराती आणि हरियाणवी गाणी गाण्यात सहजता होती. त्यांचा पहिला संगीत अल्बम वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले कुमार गंधर्व यांच्यासोबतचे युगल गीत होते. वाणी जयराम जुन्या संगीत दिग्दर्शकांबरोबरच नवीन पिढीच्या संगीतकारांसोबतही सहजतेने वावरत असत.

हेही वाचा : Playback Singer Vani Jayaram Passed Away : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details