मुंबई - बॉलिवूड अभिनेता राहुल देवने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. राहुल आता लवकरच 'कब्जा' या कन्नड चित्रपटात दिसणार आहे. पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा राहुल खऱ्या आयुष्यात मात्र दुःख आणि संकटातून जात आहे. राहुलने आता आपल्या मनाची स्थिती सांगितली आहे. 13 वर्षांनंतरही पत्नीच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या अभिनेत्याने मुलाला एकट्याने वाढवले याबद्दल भाष्य केले आहे.
पत्नीच्या निधनाबद्दल बोलताना अभिनेता बोलताना राहुल देव भावूक झाला. एकट्याने मुलाचे संगोपन करणे किती कठीण आहे याबद्दल त्याने सांगितले. 2009 मध्ये राहुल देवने पत्नी रीना देव यांना गमावले. पत्नीच्या निधनानंतर राहुल देव एकटे पडले आहेत.
कनेक्ट एफएम कॅनडाशी संवाद साधताना राहुल देव म्हणाला की, पालकत्व ही गोष्ट अजिबात सोपी नाही. मुलांच्या संगोपनात महिलांचा मोठा वाटा असतो. आई आपल्या मुलांना ज्या प्रकारे समजून घेते तसे कोणीही समजू शकत नाही. मुलांच्या बाबतीत स्त्रियांचा सजगपणा खूप वेगळ्या स्तराचा असतो. मी पण तसाच होण्याचा प्रयत्न करतो, पण कधी कधी माझा संयम हरवतो. मला आई आणि वडील दोन्ही व्हायचे आहे.
राहुल पुढे म्हणाला, मी जेव्हा मुलाच्या शाळेत पालक-शिक्षकांच्या बैठकीला जातो तेव्हा मला फक्त महिलाच दिसतात. त्यावेळी मला खूप असुरक्षितता वाटते. मुलांचे बाप कुठे आहेत असा प्रश्न पडतो.