महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

'२३ मई और सरकार गई'! ..तेजस्वी यादवांचा भाजपवर निशाणा

बिहार दौऱ्यावर आलेल्या भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दावा केला होता, की बिहारमधील ४० जागांवर एनडीएचा विजयी होणार आहे. त्यावरून तेजस्वी यादव यांनी २०१५ मध्ये भाजपचे लोक मुख्यमंत्र्यांच्या शपध विधीचे नियोजन करत बसले होते. मात्र, त्यावेळी काय झाले? तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे २३ मे ला भाजप सरकार जाणारच असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

By

Published : May 12, 2019, 4:19 PM IST

तेजस्वी यादव

पाटणा- लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज एकूण ५९ मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये बिहार राज्यात ही मतदान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एका प्रचार सभेत बोलतान राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

'२३ मई और सरकार गई' म्हणजेच २३ मे नंतर केंद्रातून मोदी सरकारची पाठवणी होणार आहे, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकार निशाणा साधला आहे.

यादव म्हणाले, भाजपचे लोक गुंडागर्दी करत आहेत. तसेच भाजपचे समर्थक जवळ शस्त्रे बाळगून प्रचार करत आहेत. आमच्या आमदारांना मारहाण केली जात आहे. बिहारमध्ये प्रशासन नावाची गोष्टच उरली नाही. भाजपकडून उघडपणे गुडंगिरी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

तेजस्वी म्हणाले, राजद पक्ष कायदे व नियम पाळणारा पक्ष आहे. आम्ही जनतेच्या सुख शांतीवर विश्वास ठेवतो. निवडणुकीमध्ये आपसी भेदभाव असतातच. मात्र, अशा प्रकारे मारहाणीच्या घटना होऊ नये. भाजपला हे समजले पाहिजे, संतापलेली जनता जर का रोडवर उतरली तर भाजपच्या लोकांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत.

'23 मे' ला भाजप सरकार जाणार-

बिहार दौऱ्यावर आलेल्या भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दावा केला होता, की बिहारमधील ४० जागांवर एनडीएचा विजयी होणार आहे. त्यावरून तेजस्वी यादव यांनी २०१५ मध्ये भाजपचे लोक मुख्यमंत्र्यांच्या शपध विधीचे नियोजन करत बसले होते. मात्र, काय झाले ? त्यावेळी तुम्हाला माहितच आहे. त्यामुळे यावेळी २३ मे ला भाजप सरकार जाणारच असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details