महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Man Killed Wife Two Kids : नराधम पतीने पत्नीसह दोन चिमुकल्यांचा खून करुन दारातच पुरले, दोन महिन्यानंतर बाहेर काढले मृतदेह

पतीने आपल्या दुसऱ्या पत्नीसह दोन चिमुकल्यांचा खून करुन मृतदेह दारात पुरल्याने खळबळ उडाली. ही घटना रतलाममध्ये घडली. मात्र घटनेला तब्बल दोन महिन्यानंतर वाचा फुटली आहे. सोनू तलवाडे असे त्या नराधम पतीचे नाव आहे. मारेकरी सोनू हा रेल्वेत गनमॅन म्हणून कार्यरत आहे. खुनाच्या घटनेनंतरही तो काहीच न घडल्याच्या आविर्भावात कर्तव्यावर जात होता.

By

Published : Jan 23, 2023, 5:23 PM IST

Man Killed Wife With Two Kids
आरोपी सोनूसह पोलीस

रतलाम - नराधम पतीने आपल्या पत्नीसह दोन चिमुकल्यांचा खून करुन दारातच त्यांना पुरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल दोन महिन्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटल्याने हे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ही घटना रतलाम शहराच्या विंध्यवासिनी आम्रपाली नगरात घडली. सोनू तलवाडे असे त्या नराधम पतीचे नाव असून त्याचे हे दुसरे लग्न होते. कौटुंबिक वादातून हा खुनाचा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रेल्वेत गँगमन आहे आरोपी :रतलाम शहरातील विंध्यवासिनी आम्रपाली नगरात आरोपी सोनूची पत्नी आपल्या आणि दोन चिमुकल्यांसह राहत होता. दोन महिन्यापूर्वी त्यांना आपल्या पत्नीसह दोन चिमुकल्याचा खून केल्याची घटना घडली होती. मात्र त्याने या प्रकरणी आपल्याला काहीच माहिती नसल्याचा पवित्रा घेतला होता. मात्र याप्रकरणी पोलिसांनी मिसींगच्या तक्रारीवरुन या प्रकरणाचा छडा लावला.

कौटुंबीक वादातून घडली घटना :नराधम सोनू तलवाडे हे रेल्वेत गँगमन म्हणून कार्यरत आहे. त्याने आपल्या दुसऱ्या पत्नीचा कौटुंबीक वादातून खून केला. आरोपी सोनूने अगोदर आपल्या दोन चिमुकल्याचा खून केल्यानंतर पत्नीला संपवल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर तीनही मृतदेह अंगणात पुरले. मात्र पत्नी आणि चिमुकले हरवल्याच्या प्रकरणात पोलिसांना सोनू तलवाडेवरच संशय होता. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतरही सोनूने पोलिसांना उडवाउडवीची माहिती दिली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच सोनूने आपणच पत्नीसह चिमुकल्याचा खून केल्याची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

दोन महिन्यानंतर बाहेर काढले मृतदेह :सोनूची पत्नी दोन चिमुकल्यासह बेपत्ता असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली होती. त्यामुळे पोलिसांनी मिसींगची तक्रार दाखल करत तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांना सोनूवरच संशय होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात कसून तपास केला. चौकशीअंती सोनूने आपला गुन्हा कबूल करत मृतदेह अंगणात पुरल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी या तिन्ही मायलेकरांचे मृतदेह बाहेर काढले. मात्र दोन महिन्यानंतर मृतदेह बाहेर काढल्याने ते पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होते. तरीही पोलिसांनी हे मृतदेह रतलाम जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

पोलिसांनी लावले कसब पणाला :रतलामच्या विंध्यवासिनी आम्रपाली नगरातून माता आणि दोन चिमुकले बेपत्ता असल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पोलिसांवर नागरिकांमधून कर्तव्यात कसूर केल्याचे आरोप होत होते. त्यामुळे पोलीस अधिक्षक अभिषेक तिवारी यांच्यासह पोलीस दला कामाला लागले होते. अखेर दोन महिन्यानंतर या प्रकरणी पोलिसांना मारेकऱ्याचा शोध लावण्यात यश आले. त्यानंतर पोलिसांनी हे मृतदेह उकरुन काढत त्याचे शवविच्छेदन केले. या गुन्ह्यात सोनूला त्याच्या एका मित्रानेही मदत केली होती. त्यामुळे पोलिसांनी मारेकरी मित्राच्याही मुसक्या आवळल्या आहेत. डीडी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पुढील तपास करत आहे.

हेही वाचा - Pune Crime News : पत्नीसोबत मित्राचे संबंध पाहून 'त्याने' स्वत:ला संपवले

ABOUT THE AUTHOR

...view details