ठाणेश्रावण Shravan मास सुरू झाला की, नागरिकांची मोठ्या प्रमाणात धाव सुरू होते. ती पौष्टिक व पारंपारिक आहाराकडे. त्यातच पावसाळ्यात पिकणारा रानमेवा Shravan Special Monsoon vegetables हा खाण्यासाठी तर नागरिकांना वेगळीच ओढ लागलेली असते. श्रावण महीन्यात प्रामुख्याने पूजाअर्चा तसेच उपवास देखील मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे नागरिकांचा कल पालेभाज्या खाण्याकडे असतो. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या Monsoon vegetables निघतात. याचेच महत्त्व लक्षात घेऊन ठाण्यात देखील मोठी मागणी huge demand for Monsoon vegetables या रानभाज्यांना आल्याचे दिसून येत आहे.
ठाणे शहराला लागून असणाऱ्याच खेडोपाड्यातून तसेच आदिवासी वस्तीतून मोठ्या प्रमाणात रानभाज्या या ठाणे शहरात येत असतात. व याच रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी, ठाणेकरांची एकच झुंबड लागलेली असते. आहारात पौष्टिकता असावी यासाठी आपण तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ बनवत असतो. परंतु पावसाळ्यात निसर्गाकडूनच मिळणाऱ्या या रानमेव्या मुळे पौष्टिकता अजूनच वाढली जाते. त्यामुळे पावसाळ्यात प्रामुख्याने रानभाज्या खाल्या जातात. रान भाज्या या शरीरासाठी उत्तम असून यात मोठ्या प्रमाणात पौष्टिकता तसेच अनेक गुणधर्म देखील असतात. त्यामुळेच नागरिकांचा कल हा वाढलेला असून बाजारात देखील नागरिक याच भाज्यांची मागणी करत आहेत. पावसाळ्यात पिकणारे प्रामुख्याने टाकळा, बोरशी, बारंगा बारनी, बाभली, मेथी, खायचा आळु, वडीचा आळु, हळदीची पाने, कंटोली, शेपु अशा अनेक भाज्या या पावसाळ्यात नागरिकांना खायला आवडतात. व यामुळे याचा खप देखील मोठ्या प्रमाणात आहे.