महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाणे शहराचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी राहणार बंद - ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद

गुरुवार(21 नोव्हेंबर) रात्री 12.00 पासून ते शुक्रवार (22 नोव्हेंबर) रात्री 12.00 वाजेपर्यंत (24 तास) ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

ठाणे शहराचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी राहणार बंद

By

Published : Nov 20, 2019, 9:56 PM IST

ठाणे - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभूळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतचले आहे. त्यामुळे गुरुवार(21 नोव्हेंबर) रात्री 12.00 पासून ते शुक्रवार (22 नोव्हेंबर) रात्री 12.00 वाजेपर्यंत (24 तास) ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

हेही वाचा -लातूरकरांना किंचित दिलासा; आता १० दिवसाला होणार पाणीपुरवठा

ठाणे महानपालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा, वागळे, लोकमान्य-सावररकर या प्रभाग समिती अंतर्गत रूपादेवीपाडा, केणीनगर, नेहरूनगर, किसननगर, नं.२ वागळे फायर ब्रिगेड, माजिवडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत गाव, बाळकूम, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत नळपाडा आदी भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details