महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kolbad Mitramandal Ganeshotsav : सव्वाशे किलो रश्शीच्या साहाय्याने साकारला देखावा; 42 वर्षांपासून मंडळाकडून सुरू आहे समाज प्रबोधन - कोलबाडच्या राजासाठी पर्यावरणपूरक अशी सजावट

ठाण्यातील कोलबाड मित्रमंडळाच्या ( Kolbad Mitramandal Ganeshotsav ) वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या कोलबाडच्या राजासाठी पर्यावरणपूरक अशी सजावट साकारली आहे. या मंडळाच्या वतीने रश्शीचा वापर करून ( King of Kolbad using Rashi ) कोलबाडच्या राजासाठी आरास साकारण्यात आली आहे. यासाठी सव्वाशे किलो रश्शीचा वापर करण्यात आला ( Eco Friendly Decoration for King of Kolbad ) आहे. तर गणपतीची मूर्तीदेखील शाडूच्या मातीची असून, त्यावरील रंगदेखील नैसर्गिक आहेत

Kolbad Mitramandal Ganeshotsav
सव्वाशे किलो रश्शीच्या साहाय्याने साकारला देखावा

By

Published : Sep 3, 2022, 2:29 PM IST

ठाणे :ठाण्यातील कोलबाड मित्रमंडळाच्या ( Kolbad Mitramandal Ganeshotsav ) वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या कोलबाडच्या राजासाठी पर्यावरणपूरक अशी सजावट साकारली आहे. या मंडळाच्या वतीने रश्शीचा वापर करून कोलबाडच्या राजासाठी ( Environment Decoration Created for King of Kolbad ) आरास साकारण्यात आली आहे. यासाठी सव्वाशे किलो रश्शीचा ( King of Kolbad using Rashi ) वापर करण्यात आला ( Eco Friendly Decoration for King of Kolbad ) आहे. तर गणपतीची मूर्तीदेखील शाडूच्या मातीची असून, त्यावरील रंगदेखील नैसर्गिक आहेत.

कोलबाड मित्रमंडळ गणेशोत्सव

कोलबाड मित्रमंडळ पर्यावरणपूरक सजावट करतात कोलबाड मित्रमंडळ दरवर्षी अशा प्रकारची पर्यावरणपूरक सजावट करीत असत. त्यामुळेच अनेक पारितोषिक या मंडळाने पटकावली आहेत. कोलबाडच्या राजाचे यंदाचे हे 42 वे वर्ष आहे. ही सजावट साकारण्यासाठी मंडळातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि परिसरातील महिलांनी हातभार लावला असल्याचे मंडळाचे सल्लागार राजू मोरे सांगतात.

भाविकांमध्ये आनंदाचे वातावरणकोरोना काळातील दोन वर्षांच्या निर्बंधामुळे हवा तसा गणेशोत्सव साजरा करता येत नव्हता. मात्र, यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करीत असताना भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याने भाविक कोलबाडच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आणि सजावट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्याचेदेखील मोरे सांगतात.


आतापर्यंत मिळाले अनेक पुरस्कारठाण्यातील कोरफड मित्रमंडळ हे सामाजिक मित्रमंडळ असून, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी मंडळाची स्थापना झाली होती. या मंडळांनी स्थापनेपासूनच सामाजिक विषयांवरती देखावे साकार करायला सुरुवात केली. कालांतराने या मंडळाच्या देखाव्यांना राज्यस्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले. या मंडळाचे नावलौकिक राज्यभर पसरले आहे.

हेही वाचाFather Poisoned Children Chandrapur : जन्मदात्यानेच चिमुकल्यांना पाजले विष; बोर्डा गावातील घटनेने खळबळ

ABOUT THE AUTHOR

...view details