महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MNS complaint : भल्या पहाटे मोठ्या आवाजात अजान सुरू असल्याची मनसेची तक्रार, व्हिडिओ केला व्हायरल - अजान मोठा आवाज मुंब्रा व्हिडिओ

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत भोंगे ( MNS complaint over Azaan at big sound at mumbra ) लावण्यावर बंदी असतानाही मुंब्रात ( Azaan Mumbra MNS Complaint ) भल्या पहाटे सुरू असलेल्या अजानचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करून मनसेने मुंब्रा ( loudspeaker news thane ) पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

MNS complaint over azaan at big sound at mumbra
मोठ्या आवाजात अजान तक्रार मुंब्रा मनसे

By

Published : May 1, 2022, 7:09 AM IST

ठाणे -मशिदीवरील भोंगे ३ मे पर्यत काढले नाही, तर मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याविरोधात मुंब्रातील मौलवींनी शांततेचे आवाहन करून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्याचे म्हटले होते. मात्र, हे दावे मनसेने फोल ठरवले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत भोंगे ( MNS complaint over Azaan at big sound at mumbra ) लावण्यावर बंदी असतानाही मुंब्रात ( Azaan Mumbra MNS Complaint ) भल्या पहाटे सुरू असलेल्या अजानचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करून मनसेने मुंब्रा ( loudspeaker news thane ) पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अजान सुरू असल्याचा व्हायरल व्हिडिओ
मनसेचे पत्र

हेही वाचा -Youth Rescued From Ship : येमेनमध्ये हायजॅक झालेल्या जहाजावरून कल्याणमधील तरुणाची सुटका, पंतप्रधानांचे मानले आभार

मनसेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे सर्वोच्च न्यायालयाची अवहेलना केल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत (भोंगे) लाऊडस्पीकरवर बंदी असताना शनिवारी मुंब्रा भागात पहाटे ४ वाजून ५६ मिनिटाला मोठ्या आवाजात अजान पठण सुरू असल्याचे विडिओ काही जणांनी मनसेकडे पाठवले आहेत. तेव्हा, हा प्रकार न्यायालयाच्या निर्णयाची अवहेलना असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. तसेच, सोशल मीडियातही हे व्हिडिओ व्हायरल करून पोलिसांना कारवाईचे आवाहन केले आहे.

पत्रातून केल पोलिसांना आवाहन -कोणत्याही अटी शर्थीचे पालन न करता मुंब्रा भागात भोंगे लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंब्रात काही मौलवींनी पत्रकार परिषद घेऊन, शांततेचे आवाहन करीत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन केले जाईल, असे सांगितले होते. मात्र, तसे चित्र दिसत नसून एकाला एक न्याय आणि या मंडळींना दुसरा न्याय का ? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे.

हेही वाचा -Thane Water Shortage : तलावांच्या शहरात पाण्याची समस्या; नागरिकांचे हाल

ABOUT THE AUTHOR

...view details