महाराष्ट्र

maharashtra

अत्याधुनिक सुविधा, मनुष्यबळाचा अभावाने रुग्णांचे हाल; ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बाब

By

Published : Jul 24, 2022, 8:19 PM IST

ठाणे (Thane) जिल्हयातील लाखो शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुविधेचे आश्रयस्थान असलेले पालिकेचे एकमेव छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) आहे. याच रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामुग्री (Lack of modern facilities) व (lack of manpower for patients) मनुष्यबळाची अपूर्तता असल्याने, आशेने आलेल्या रुग्णांना मुंबईतील रुग्णालयाचा रस्ता दाखविण्याची नामुष्की ओढवलेली आहे. राजकीय उदासीनता आणि प्रशासनाचा वेळकाढूपणा यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय

ठाणे : (Thane) लाखो शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुविधेचे आश्रयस्थान असलेले पालिकेचे एकमेव छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) आहे. याच रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामुग्री (Lack of modern facilities) व मनुष्यबळाची अपूर्तता (lack of manpower for patients) असल्याने, आशेने आलेल्या रुग्णांना मुंबईतील रुग्णालयाचा रस्ता दाखविण्याची नामुष्की ओढवलेली आहे. राजकीय उदासीनता आणि प्रशासनाचा वेळकाढूपणा यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.

बातचित करतांना ईटिव्ही भारतचे प्रतिनिधी


ठाण्यात शासनाचे सिव्हिल रुग्णालय तर पालिकेचे एकमेव असलेले छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. या दोन्ही रुग्णालयात शहर तथा ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावर आणि अपुरे मनुष्यबळ असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलेला आहे. रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रासमुग्रीचा अभाव, डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्या कमतरतेने रुग्णांच्या आणि त्यांच्यासोबत नातेवाईकांच्या हालअपेष्टा होत आहेत. येथे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना उपचार योग्य सुविधा नसल्याने, त्यांना उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात पाठविण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. ठाणेकर आणि ग्रामीण भागातील रहिवाशांसाठी सुपरस्पेशालिटी रुग्णालय कधी उपलब्ध होईल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.


भरती करा....30 रुग्णांच्या मागे 2 परिचारिका :ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात परिचारिकांची संख्या अतिशय कमी असून रुग्णालयातील 60 रुग्णांच्या मागे 2 परिचारिका असे रुग्णालयाचे मनुष्यबळ आहे.त र आयसीयुमध्ये दाखल असलेल्या ३० रुग्णांमागे २ परिचारिका काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे मनुष्यबळ कमी असल्याने रुणांची हेळसांड तर दुसरीकडे लागलेल्या रांगामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


हेही वाचा :Monkeypox Case Found In Delhi : राजधानी दिल्लीत आढळला मंकी पॉक्सचा रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details