महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डोंबिवलीच्या रेल्वे उड्डाणपुल संदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय - रेल्वे उड्डाणपुल

उड्डाणपूलावरील वाहतूक २७ मे पासून बंद केली तर, डोंबिवलीत वाहतुकीची मोठी कोंडी होणार आहे. कारण, जोशी हायस्कूल बाजूला बांधण्यात आलेला नवा पूलावर अवजड वाहनांना बंदी आहे.

उड्डाणपूलकोपर उड्डाणपूल

By

Published : May 21, 2019, 5:31 PM IST

ठाणे- डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर उड्डाणपूल आहे. ४० वर्षापूर्वी उभारण्यात आलेला हा पूल २७ मे पासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्देश मध्य रेल्वे विभागीय प्रबंधकांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला दिला आहे. यामुळे डोंबिवली शहरवासीयात खळबळ माजली आहे. हा पूल बंद झाला मोठी वाहतूक समस्या निर्माण होणार आहे.

कोपर उड्डाणपूल, डोंबिवली
मध्य रेल्वेचे अभियंते डी. डी. लोलगे यांनी पालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांना पत्र पाठवले आहे. डोंबिवलीतील रेल्वेवरील उड्डाणपुलाचे आयआयटी मुंबई यांनी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. त्या अहवालामध्ये पुलाच्या दुरुस्ती संबंधी शिफारस करण्यात आली आहे. यासाठी २७ मे २०१९ पासून पूल वाहतूकीसाठी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ऑगस्ट २०१७ मध्येही डोंबिवलीचे स्ट्रक्चरल ऑडिटर माधव चिकोडी यांनीही पुलाचे ऑडिट केले होते. पुलावरील जाहिरातीचे मोठे फलक तातडीने काढण्याची सूचना त्यांनी केली होती. पुलाला काही ठिकाणी राजाजी पथाच्या दिशेला तडे गेले होते, त्याची दुरुस्ती करण्यात यावी. पुलावरील गवत काढून टाकावेस, अशा सूचना केल्या होत्या.

उड्डाणपूलावरील वाहतूक २७ मे पासून बंद केली तर, डोंबिवलीत वाहतुकीची मोठी कोंडी होणार आहे. कारण, जोशी हायस्कूल बाजूला बांधण्यात आलेला नवा पूलावर अवजड वाहनांना बंदी आहे. जुन्या पुलावरुन हलक्या वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिल्यास बराच प्रश्न कमी होणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी म्हणाल्या, महापालिकेस फक्त पत्र प्राप्त झाले आहे. आयआयटीचा अहवाल प्राप्त झाला नाही. तो प्राप्त झाल्यावर त्यासंबंधात निर्णय घेण्यात येईल. मात्र, रेल्वे प्रशासनाने पत्रासोबतच अहवाल पाठविल्याचा दावा केला आहे. यामुळे महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्यात वाद होण्याची चिन्हे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details