ठाणे :महाराष्ट्रात रस्त्यांवर होणारे अपघात हे मानवी चुकीमुळे होत आहेतच ( Road accidents have increased in Maharashtra ) मात्र परिवहनच्या नियमांचे उल्लंघन ( Violation of road traffic rules in Maharashtra ) झाल्याने सर्वात जास्त अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी आवश्यक असलेले परिवहन विभागाचे ( Maharashtra Transport Department ) प्रयत्न देखील भ्रष्टाचारामुळे होताना ( transport department responsible for accident ) दिसत नाहीत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव रस्त्यातील अपघातामध्ये जात आहे.
परिवहन विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपघात -दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे झालेल्या बस अपघातात 12 जणांचा बळी गेला होता. ही बस आपल्या प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात होती. या बसला अपघात होण्यास कारणीभूत ठरलेला ट्रक हा गुजरात राज्यातील होता. या ट्रकचे सर्व कागदपत्र हे देखील सुरुवातीच्या तपासात अर्धवट असल्याचे जाणकार सांगत असून परिवहन विभागाने ( Accidents due to laxity of transport department ) योग्य वेळी जर कारवाई केली असती तर, कारवाई झाल्यामुळे अधिक प्रवासी बस मधून गेले नसते. या अपघातात बळींची संख्या ही कमी झाली असती. मात्र प्रत्येक महिन्याला सुरू असलेल्या परिवहन विभागाचा हप्ता हा अशा प्रकारच्या अपघातात नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहे
ट्रान्सपोर्ट वाहनांबद्दल होणारा हलगर्जीपणा -मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा फिटनेस हा सर्वात गंभीर विषय आहे कारण सर्वाधिक रस्त्याचा वापर हा मालवाहतूक करणारे वाहन करतात या वाहनांमध्ये ओव्हरलोड वाहन सुरक्षिततेच्या उपायोजना न केलेली वाहन आणि अवैधरित्या वाहतूक करणारी वाहनही परिवहन विभागाचा आशीर्वाद मिळाल्यानंतरच रस्त्यावर धावतात. आणि अपघातास कारणीभूत ठरवून लोकांचे बळी घेतात.
मृत्यु झाल्यानंतर ही मिळतात वाहन परवाने - परिवहन विभागाच्या गलथान कारभारामुळे मृत्यूनंतर ही दाखले मिळू शकतात हे ठाणे व आरटीओ मध्ये जिवंत उदाहरण पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे अनेक मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आरटीओकडून परवाने दिल्याची तक्रार पोलिसांच्या चौकशीच्या आधीन आहे.