महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Road Accidents Increased : अपघातास परिवहन विभागाचा भ्रष्टाचार जबाबदार, परिवहन विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपघात - transport department responsible for accident

महाराष्ट्रात रस्त्यांवर होणारे अपघात हे मानवी चुकीमुळे होत आहेतच ( Road accidents have increased in Maharashtra ) मात्र परिवहनच्या नियमांचे उल्लंघन ( Violation of road traffic rules in Maharashtra ) झाल्याने सर्वात जास्त अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी आवश्यक असलेले परिवहन विभागाचे ( Maharashtra Transport Department ) प्रयत्न देखील भ्रष्टाचारामुळे होताना ( transport department responsible for accident ) दिसत नाहीत.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Oct 10, 2022, 6:03 PM IST

ठाणे :महाराष्ट्रात रस्त्यांवर होणारे अपघात हे मानवी चुकीमुळे होत आहेतच ( Road accidents have increased in Maharashtra ) मात्र परिवहनच्या नियमांचे उल्लंघन ( Violation of road traffic rules in Maharashtra ) झाल्याने सर्वात जास्त अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी आवश्यक असलेले परिवहन विभागाचे ( Maharashtra Transport Department ) प्रयत्न देखील भ्रष्टाचारामुळे होताना ( transport department responsible for accident ) दिसत नाहीत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव रस्त्यातील अपघातामध्ये जात आहे.

Road Accidents Increased

परिवहन विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपघात -दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे झालेल्या बस अपघातात 12 जणांचा बळी गेला होता. ही बस आपल्या प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात होती. या बसला अपघात होण्यास कारणीभूत ठरलेला ट्रक हा गुजरात राज्यातील होता. या ट्रकचे सर्व कागदपत्र हे देखील सुरुवातीच्या तपासात अर्धवट असल्याचे जाणकार सांगत असून परिवहन विभागाने ( Accidents due to laxity of transport department ) योग्य वेळी जर कारवाई केली असती तर, कारवाई झाल्यामुळे अधिक प्रवासी बस मधून गेले नसते. या अपघातात बळींची संख्या ही कमी झाली असती. मात्र प्रत्येक महिन्याला सुरू असलेल्या परिवहन विभागाचा हप्ता हा अशा प्रकारच्या अपघातात नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहे

ट्रान्सपोर्ट वाहनांबद्दल होणारा हलगर्जीपणा

ट्रान्सपोर्ट वाहनांबद्दल होणारा हलगर्जीपणा -मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा फिटनेस हा सर्वात गंभीर विषय आहे कारण सर्वाधिक रस्त्याचा वापर हा मालवाहतूक करणारे वाहन करतात या वाहनांमध्ये ओव्हरलोड वाहन सुरक्षिततेच्या उपायोजना न केलेली वाहन आणि अवैधरित्या वाहतूक करणारी वाहनही परिवहन विभागाचा आशीर्वाद मिळाल्यानंतरच रस्त्यावर धावतात. आणि अपघातास कारणीभूत ठरवून लोकांचे बळी घेतात.

परिवहनच्या नियमांचे उल्लंघन

मृत्यु झाल्यानंतर ही मिळतात वाहन परवाने - परिवहन विभागाच्या गलथान कारभारामुळे मृत्यूनंतर ही दाखले मिळू शकतात हे ठाणे व आरटीओ मध्ये जिवंत उदाहरण पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे अनेक मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आरटीओकडून परवाने दिल्याची तक्रार पोलिसांच्या चौकशीच्या आधीन आहे.

परिवहन विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपघात

बोगस कागदपत्रांच्या आधारे निघत लायसन्स -ठाणे आरटीओ मध्ये परवाना देण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र बोगस वापरून परवाने दिल्या बाबत अनेक गुन्हे दाखल झाले असून या प्रकाराची देखील चौकशी ठाणे पोलीस करत आहेत हे परवाने देत असताना ज्या अधिकाऱ्यांची जबाबदारी या परवानांसाठी आवश्यक असलेले कागदपत्र तपासणे हि असते ही जबाबदारी देखील योग्य रीतीने पार पाडली गेली नाही असे चौकशीत समोर आले आहे.



राज्याबाहेरील वाहनांचा फिटनेस 38 चा घोटाळा -राज्यात आणि राज्याबाहेर असलेल्या ट्रान्सपोर्ट वाहनांचे पासिंग करण्यासाठी आवश्यक असतो 38 आणि 38a हा नियम देखील योग्य रीतीने पाळला जात नाही, फिटनेस तपासण्यासाठी वाहन प्रत्यक्षात हजर असणे आवश्यक असते ते देखील भ्रष्टाचारामुळे पार पाडले जात नाही आणि वाहनांच पासिंग केली जाते.

प्रादेशीक परिवहण विभाग

ऑनलाईन असूनही घोटाळा सुरूच - परिवहन विभागाचा सर्व व्यवहार हा ऑनलाईन आहे,मात्र तरी देखील अधिकारी एजंट यांच्या संगनमतामुळे हा भ्रष्टाचार सुरू आहे. अवश्यक असलेला अंकुश देखील परिवहन विभागावर नसल्यामुळे हे अपघात होत असल्याचे जाणकार सांगत आहेत.

अपघात अर्ध्यावर येतील -जर परिवहन विभागाचे नियम काटेकोरपणे पार पाडले,तर अपघात अर्ध्यावर येतील असा विश्वास जाणकार सांगत आहेत.
नियमाची पायमल्ली आणि नियमांकडे दुर्लक्षासाठी भ्रष्टाचार सुरू आहेत, कारण सर्व वाहनांचे पासिंग करताना त्यांची चाचणी ही व्हिडीओ रेकॉर्डिंग करून करावी असा नियम असताना या नियमाचे पालन प्रत्यक्षात होत नाही याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहेत त्याचे देखील पालन परिवहन विभाग करत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details