महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shinde Flag Hoisting मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बालेकिल्ल्यात मध्यरात्री केले ध्वजारोहण - Rules for unfurling the national flag

भारत आज आपला ७६ वा स्वातंत्र्यदिन Indian Independence Day celebration अत्यंत उत्साहात आणि देशभरात देशभक्तीच्या भावनेने साजरा करत आहे. महाराष्ट्रही सर्वत्र तिरंगामय झाल्याचे दिसत आहे.

Maharashtra CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Aug 15, 2022, 6:50 AM IST

Updated : Aug 15, 2022, 7:08 AM IST

ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे शहरात मध्यरात्री ध्वजारोहण Eknath Shinde attends a flag hoisting केले. यावेळी त्यांचे चिरंजीव खासादर श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते flag hoisting ceremony at midnight in Thane उपस्थित होते. महाविकास आघाडीत एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री काम पाहिले आहे. त्यांचे या मतदारसंघावर आजवर वर्चस्व राहिले आहे.

भारत आज आपला ७६ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशभरात देशभक्तीच्या भावनेने साजरा करत आहे. राजधानी दिल्लीत भव्य सोहळा होणार आहे. राज्यात मंत्री, शासकीय अधिकारी हे विविध ठिकाणी ध्वजारोहण करणार आहेत.

कसा हवा राष्ट्रध्वजशासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्याचे काही महत्त्वाचे नियम Rules for unfurling the national flag आहेत. त्यामधला पहिला नियम म्हणजे तिरंगा राष्ट्रध्वज हा खादीचाच असावा, त्याच बरोबर राष्ट्रध्वज हा हाताने कातलेल्या कापडापासून तयार केलेला असावा. राष्ट्रध्वज आयातकार आकाराचा असावा.

राष्ट्रध्वज फडकवतानांची काय आहेत नियमराष्ट्रध्वज सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत फडकविता येतो. झेंडा कधीही जमिनीवर ठेवता येणार नाही. कधीही झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये. ज्या कार्यालयात ध्वजारोहण सोहळा संपन्न होत आहे त्या कार्यालयाच्या अधिकाऱ्याला ध्वजारोहणाचा अधिकार असतो. ज्याप्रमाणे शिस्तीत ध्वजारोहण केलं जातं त्याचप्रमाणे सूर्यास्तापूर्वी ध्वज खाली उतरवण्याची प्रक्रिया देखील पार पाडली जाते.



अमृत महोत्सवभारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा ७५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला. यानिमत्त देशभरात विविध कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. हा ​​महोत्सव १२ मार्च २०२२ रोजी सुरू झाला असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा केला जाईल. औपचारिकप्रथेप्रमाणे भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भारतीय ध्वज फडकवतील आणि त्यानंतर भाषण देतील. भारतातील विविध राज्ये आणि आणि केंद्रशासित प्रदेशदेखील त्यांच्या स्थानिक पातळीवर हा उत्सव गावोगावी साजरा करतील. महाराष्ट्रातील ठाणे शहरात अमृत महोत्सवाची स्वतःची संकल्पना तयार केली आहे.

हेही वाचाIndependence Day भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास हर घर तिरंगा मोहिम वाचा सविस्तर

Last Updated : Aug 15, 2022, 7:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details