महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक..! मुलीच्या लग्नास नकार दिल्याच्या वादातून बापाची हत्या, आरोपी अटकेत - Murder case Pappu Kumar Shah

बापाने मुलीच्या लग्नास नकार दिल्याच्या वादातून तरुणाने तिच्या वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी - वाड राज्यमार्गावरील कवाड गावाच्या हद्दीत घडली आहे.

Kamaljit Sande murder case
कमलजित सांडे

By

Published : Mar 15, 2022, 7:18 AM IST

ठाणे - बापाने मुलीच्या लग्नास नकार दिल्याच्या वादातून तरुणाने तिच्या वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी - वाड राज्यमार्गावरील कवाड गावाच्या हद्दीत घडली आहे.

माहिती देताना कमलजित यांची पत्नी आणि मुलगी

हेही वाचा -Case Against Couple : रेल्वे स्थानकात खुल्लमखुल्ला रोमान्स करणाऱ्या 'त्या' प्रेमीयुगलावर गुन्हा दाखल

याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पप्पूकुमार रामकिशोर शाह (वय २६) असे आरोपी तरुणाचे नाव असून, तो मूळचा बिहार राज्यातील रहिवासी आहे. तर, कमलजित सांडे (वय ५२) असे हत्या झालेल्या बापाचे नाव आहे.

डोक्यात लग्नाचे भूत शिरल्याने काढला काटा

कमलजित कुटंबासह उल्हासनगर कॅम्प नंबर ५ परिसरात राहात, तर त्याच शेजारी आरोपी पप्पू गेल्या ५ वर्षांपासून राहत असल्याने दोघांमध्ये ओळख होती. त्यामुळे, आरोपीचे कमलजित यांच्या घरी येणे जेणे होते. त्यातच काही महिन्यांपूर्वी आरोपीने कमलजित यांच्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी मागणी केली. मात्र यामधून दोघांमध्ये भाडणे होऊन कमलजित यांनी आरोपीला मारहाण केली होती. त्यानंतर आरोपीने कमलजित यांची माफी मागत पुन्हा बोलचाल सुरू केली. मात्र आरोपीच्या डोक्यात लग्नाचे भूत शिरल्याने आरोपी पप्पूने कमलजित यांचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार ४ मार्च रोजी पार्टीच्या बहाण्याने कल्याणहून भिवंडीला बसमध्ये नेले. त्यानंतर आनगावला जाणाऱ्या एका खासगी वाहनात बसले. मात्र, मध्येच कवाड गावाच्या हद्दीत उतरून एका कंपाऊंड असलेल्या मोकळ्या जागेत बसून दोघांनी दारूची पार्टी केली. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा लग्नाच्या मागणीवरून वाद झाला. त्यावेळी आरोपीने कमलजित यांच्या गळ्यावर चाकूने वार करून घटनास्थळावरून तो पुन्हा उल्हासनगरात आला.

गुन्हा करून आरोपी पळाला बिहारला

दुसरीकडे वडील घरी आले नाही म्हणून कमलजित यांच्या मुलीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता रिंग वाजली, त्यानंतर मोबाईल बंद येत होता. त्यामुळे, मुलीने आरोपीकडे वडिलांची चौकशी केली. त्याने वडील उशिरा घरी येतील असे सांगितले. मात्र,दोन दिवस उलटूनही वडील घरी आले नाही. म्हणून पुन्हा आरोपी पप्पूला मुलीने जाब विचारला असता तुझे वडील आता कधीच घरी येणार नाही, असे बोलून निघून गेला. तर कमलजित यांच्या पत्नीने स्थानिक हिललाईन पोलीस ठाण्यात जाऊन पती 4 मार्चला आरोपी पप्पूसोबत गेला, मात्र अजूनही परत आला नाही, असे सांगताच पोलीस त्याच्या घरी गेली होती. त्यानंतर त्याला कळून चुकले की पोलीस आपल्याला अटक करतील, त्यामुळे 9 मार्चला पहाटेच्या सुमारास आपल्याला आई घेऊन आरोपी मूळ गावी बिहारला पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.

१९ मार्चपर्यत पोलीस कोठडी

भिवंडी तालुक्यातील कवाड गावातील एका कंपाऊंडमध्ये 9 मार्च रोजी कमलजित यांचा मृतदेह पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत त्यांची ओळख पटवून हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला असता, 13 मार्च रोजी भिवंडी ग्रामीण पोलिसांचे एक पथक बिहार राज्यातील पिप्राखेर गावात पोहचून आरोपी पप्पूला पाहटेच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक करून त्याला भिवंडीत आणले. आज (सोमवार ) आरोपी पप्पूला न्यायालयात हजर केले असता १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन दाभाडे करीत आहेत.

हेही वाचा -गळ्यावर चाकू ठेवून केली सव्वादहा लाखाची लूट... स्वीगी बॉयचा प्रताप

ABOUT THE AUTHOR

...view details