महाराष्ट्र

maharashtra

दीड वर्षानंतर सोलापुरातील शाळांमध्ये 'किलबिलाट' सुरू.. वर्गमित्रांसमवेत विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव

By

Published : Oct 4, 2021, 9:34 PM IST

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तसेच शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज सोलापुरातील सर्व शाळांमध्ये तब्बल दीड वर्षाच्या अंतराने विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. 8 वी ते 12 वी पर्यंतचे सर्व वर्ग सुरू केल्याने सोलापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या आनंदाने शाळेत हजर होते.

school reopen in solapur
school reopen in solapur

सोलापूर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून राज्यभरातील शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तेव्हापासून सोलापुरातील खासगी व सरकारी शाळांना कुलूप होते. गेल्या दीड वर्षांपासून शालेय विद्यार्थ्याने ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेत शिक्षण सुरू ठेवले होते. पण ऑनलाइन शिक्षणापासून अनेक विद्यार्थी वंचित होते. अखेर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तसेच शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 8 वी ते 12 वी पर्यंतचे सर्व वर्ग सुरू केल्याने सोलापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या आनंदाने शाळेत हजर होते.

सोलापूर जिल्ह्यातील शाळा दीड वर्षानंतर सुरू
मास्क,सॅनिटायजर आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर -

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शाळांत विद्यार्थ्यांसाठी त्रिसूत्रीचा वापर पाहावयास मिळाला. प्रत्येक विद्यार्थी मास्क परिधान करून वर्गात हजर होता. सॅनिटायझरचा वापर करून प्रवेश दिला गेला. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्यात आले होते. सोशल डिस्टन्सिंग पालन करूनच वर्ग सुरू करण्यात आले.

दीड वर्षानंतर शाळा सुरू-

गेल्या दीड वर्षांपासून शाळेत स्मशान शांतता होती. विद्यार्थ्यांचा किलबिलाट नसल्याने सन्नाटा पसरला होता. पण आज 4 ऑक्टोबर सोमवारपासून 8 वी ते 12वी वर्ग शाळा सुरू झाल्याने पुन्हा एकदा शाळांत विद्यार्थ्यांचा किलबिलाट किंवा गोंधळ सुरू झाला. दीड वर्षांपासून दुरावलेल्या वर्गमित्रांची पुन्हा एकदा भेट झाली.

हे ही वाचा -अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर 'ज्ञानपीठ' उघडले; नागपुरातील २२५ शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट



गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत-

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी विशेष लक्ष देत शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी या गावात जाऊन स्वतः जिल्हा परिषद सीईओ स्वामी यांनी वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देत स्वागत केले.

हे ही वाचा -School Reopen : शाळेची घंटा वाजली; चिमुकल्यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत शेअर केल्या भावना

ABOUT THE AUTHOR

...view details