महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ramdas Athavale On Loudspeaker Controversy : मशिदीवरचे भोंगे उतरवले जाणार नाहीत - रामदास आठवले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्व धर्म समभाव आणि सर्व धर्मांना सर्व हक्क आणि समान न्याय यावर भाष्य केलेले आहे. तर, मग मशिदीवर जे भोंगे आहेत, त्याला विरोध का?, असा सवाल केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी उपस्थित केला ( Ramdas Athavale On Loudspeaker Controversy ) आहे.

By

Published : Apr 23, 2022, 9:18 PM IST

Ramdas Athavale
Ramdas Athavale

पुणे - भारत हा अल्पसंख्यांक देश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्व धर्म समभाव आणि सर्व धर्मांना सर्व हक्क आणि समान न्याय यावर भाष्य केलेले आहे. तर, मग मशिदीवर जे भोंगे आहेत, त्याला विरोध का?, असा सवाल केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी उपस्थित केला आहे. त्यामुळे यापुढे मशिदीवरचे भोंगे न उतरवता मंदिरावर भोंगे लावा. मात्र, मशिदीवरचे भोंगे उतरवले जाणार नाहीत. राज ठाकरेंनी भगव्याचे राजकारण करू नये, अशी टीकाही आठवलेंनी केली ( Ramdas Athavale On Loudspeaker Controversy ) आहे.

रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे हे फक्त धर्माचे राजकारण करत आहेत. पण, मशिदीवरील भोंगे कुठल्याही परिस्थितीत खाली उतरवले जाणार नाही. जर तीन तारखेला राज ठाकरेंनी अशी भूमिका घेतली. तर, रिपाईचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक मशिदीच्या बाहेर उभे राहून त्या भोंग्यांचे रक्षण करतील.

रामदास आठवले प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

बाळासाहेब ठाकरेंनी कधीही भोंग्यांना विरोध केला नाही. मात्र, त्यांनी प्रत्येकवेळी हिंदुत्वाचा प्रचार केला. राज ठाकरे यांना देखील जर हिंदुत्वाचा प्रचार करायचा असेल, तर अंगावर भगवी शाल ओढून तो होत नाही. त्यामुळे समाजात फक्त तेढ निर्माण होते, असेही आठवलेंनी स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडीवर निशाणा साधत आठवले यांनी म्हटले की, सध्याचे आघाडीचे सरकार हे बिघडीचे सरकार आहे. ठाकरे सरकार हे पूर्णपणे फेल आहे. राज्य सराकार बरखास्त करुन आता राष्ट्रवती राजवट लागू करावी, अशी मागणी आठवलेंनी केली आहे.

हेही वाचा -Narayan Rane On Rana controversy : नारायण राणेंचे महाविकास आघाडीला आव्हान; म्हणाले, 'राणांना सुरक्षित जाऊद्या नाहीतर...'

ABOUT THE AUTHOR

...view details