महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात गृहमंत्र्यानी पोलीसांसोबत नव वर्ष केले साजरे - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बद्दल बातमी

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीसांसोबत नववर्षाचे स्वागत केले. यावेळी रात्री बारा वाजता तक्रारीचा कॉल गृहमंत्र्यानी उचलला.

home-minister-celebrates-new-year-with-police-in-pune
पुण्यात गृहमंत्र्यानी पोलीसांसोबत नव वर्ष केले साजरे

By

Published : Jan 1, 2021, 3:28 AM IST

पुणे -नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी होप 2021 अशा आशयाचा केक कट करत स्वागत केले. पोलीस कर्मचाऱ्यांना केकचे वाटप करत त्यांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. नवीन वर्षानिमित्त संकल्प करत पोलीसांसाठी काम करायचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वेळी कंट्रोल रूमला भेट देत बरोबर 12 वाजताचा तक्रारीचा कॉल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उचलला. नवीन वर्षातील तो पहिला कॉल होता. एका सोसायटीत नवीन वर्षाचे स्वागत 12 पर्यंत सुरु आहे. आवाज कमी करायला सांगा असा तो कॉल होता. लगेच त्या हद्दीतील पोलीस ठाण्याकडे त्यांनी कॉल दिला.

पुण्यात गृहमंत्र्यानी पोलीसांसोबत नव वर्ष केले साजरे

काही वेळात नवीन वर्षात पदार्पण -

दहा महिने डॉक्टर नर्स पोलीस सर्वजण लढत आहेत. आमचे पोलीस दिवस रात्र रस्त्यावर आहेत. ३१ डिसेंबर सर्वजण उत्साहात साजरा करतात. तरीही आम्ही कायदा व्यवस्था राखण्यासाठी काम करत आहेत. कंट्रोल रूममध्ये येऊन पोलीसांसोबत नवीन वर्ष साजरा करणार आहे. ३२ जिल्ह्यात फिरलो, पोलिसांसोबत राहीलो नागरिकांनी सहकार्य केले.

2021 संकल्प -

२०२१ मध्ये महिला अत्याचार बाबत लवकर शिक्षा झाली पाहिजे, महिला अत्याचार कमी झाले पाहिजे, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे गृहमंत्री म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांवर टीका -

राज्यातील पोलीसांच्या घरासाठी येणाऱ्या काळात काम करणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस विरोधीपक्ष नेते आहेत, त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचे कारण नाही असे गृहमंत्री म्हणाले.

शक्ती कायदा -

महीला अत्याचारा वीरोधात शक्ती कायदा आणला जात असल्याचे गृहमत्री म्हणाले. या कायद्यामुळे आरोपीला लवकर शिक्षा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महेबुब शेखयांच्या तक्रारी बद्दल -

मेहबूब शेख बाबत औरंगाबाद तक्रार आली आहे. त्या ठीकाणी जाऊन आमच्या पोलिसांनी चौकशी केली, कधी त्याचा संबंध आला नाही, यामागे राजकारण आहे. मेहबूब शेखला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

औरंगाबाद नामांतर विषय -

औरंगाबाद नाव बद्दल प्रश्न अजून मंत्रिमंडळा समोर आला नाही आहे, जेव्हा येईल त्यावेळेस पाहू, असे म्हणत नवीन वर्षाच्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला गृहमंत्र्यानी शुभेच्छा दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details