पुणे -आम्ही कंगना रनौत (Kangana Ranaut Controversial statement) यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. परंतु विचार स्वातंत्र्यात काही बरगड्याचे याची लोकांना सवय झाली आहे. याला राजाश्रय मिळतंय ही दुर्दैवी बाब आहे. या लोकांना स्वातंत्र्य लढ्याचा गंधही नाही. कोणी कोणी काय केले कसे या देशाला स्वातंत्र मिळाले हे यांना माहीत नाही. जी लोक तुरुंगात गेली आपले रक्त साडले. या स्वातंत्र्यासाठी त्या सर्व महान असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा हा अपमान आहे. शासनाकडून अशा व्यक्तींना गौरविले जाते आणि त्या व्यक्तींने अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यासाठी बोलले जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे, असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिली आहे. जी मानसिकता भारतीय जनता पक्षाच्या वतीने पसरविली जात आहे. हिंदुत्ववादाची जी फॅसिस्ट फिलॉसॉफी त्याआधारे असे लोक वक्तव्य करून समाजात अंतर निर्माण करत आहे. आजपर्यंत कोणीही स्वातंत्र्य सैनिकांबद्दल अशा पद्धतीने अनादरपणे बोलले नव्हते. हे अत्यंत निषेधार्थ आहे, असेही ते म्हणाले.
'एस टी कर्मचाऱ्यांबाबत तोडगा निघणार'
शासनाच्या वतीने प्रयत्न सुरू असून बरेच तोडगा काढण्यात आले आहेत. जगात कुठेही सार्वजनिक सेवा ही नफ्यात चालत नाही. त्याला शासनाकडून अनुदान द्यावे लागतो. अनुदान देताना त्यावर तोडगा काढण्यात आला पाहिजे. एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामंजस्याने योग्य तो तोडगा निघणार आहे, असे देखील यावेळी चव्हाण म्हणाले.
'ज्यांना राजाश्रय मिळत आहे तेच आज बोलत आहे'