महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'पालकमंत्री असताना गिरीश बापटांनी पाच वर्षे काय दिवे लावले?' - मोहन जोशी यांची बापटांवर टीका

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी यांनी बापट आणि भाजपवर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. बापट यांनी पाच वर्षे पालकमंत्री असताना काय दिवे लावले. नाचता येईना आणि आंगण वाकडे, अशी भाजपची अवस्था झाल्याचा निशाणा जोशी यांनी भाजपवर साधला आहे.

गिरीश बापट
गिरीश बापट

By

Published : May 21, 2020, 6:13 PM IST

पुणे - राज्यात कोरोना विषाणूने कहर सुरू केला आहे. त्याचप्रमाणे पुण्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. त्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळानं नुकतीच पालिका आयुक्तांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी उपाययोजना सुधारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावरून आता काँग्रेसने बापट यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी यांनी बापट आणि भाजपवर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. बापट यांनी पाच वर्षे पालकमंत्री असताना काय दिवे लावले. नाचता येईना आणि आंगण वाकडे, अशी भाजपची अवस्था झाल्याचा निशाणा जोशी यांनी भाजपवर साधला आहे.

जोशी म्हणाले, की पालिकेत भाजपचा महापौर, 100 नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेताही भाजपचा आहे. त्यामुळे बापट यांनी पालिकेत भाजप अपयशी ठरल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे. बापट यांनी स्टंटबाजी केली. मात्र त्यांनी भाजपची फजिती करून घेतली असल्याची टीकाही केली.

भाजप लोकप्रतिनिधींनी, नगरसेवकांनी आपला फंड पीएम केअरला दिला आणि राज्य सरकार, प्रशासनावर ठपका ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details