पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावराणात बदल होत आहे. कधी पाऊस तर कधी कडक ऊन पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात सध्या मोठया प्रमाणात वातावरणीय बदल होत आहे. यावर्षी उन्हाळा अधिक उष्ण ठरत आहे. त्याचा फटका आंब्याला बसला आहे. उष्णता वाढल्याने डझनापैकी एक ते दोन हापूस आतून खराब होत आहेत. तसेच, फळाच्या रंगासह त्याची चवही बदलली आहे. देठाजवळ आंबा काळा पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.
Mangoes Prices : वातावरणीय बदलाचा आंब्याला फटका, आवक वाढल्याने किंमती झाल्या कमी - उष्णतेचा आंब्याला फटका
उष्णता वाढल्याने डझनापैकी एक ते दोन हापूस आतून खराब होत आहेत. तसेच, फळाच्या रंगासह त्याची चवही बदलली आहे. देठाजवळ आंबा काळा पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.
![Mangoes Prices : वातावरणीय बदलाचा आंब्याला फटका, आवक वाढल्याने किंमती झाल्या कमी Mango](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15124575-thumbnail-3x2-mango.jpg)
Mango
वातावरणीय बदलाचा आंब्याला फटका
आंबा झाला स्वस्त -आंब्यांची आवक सध्या प्रचंड वाढली ( Mangoes arrivals increased ) आहे. गेल्या दीड-दोन महिन्यात आंबे कमी होते. माल कमी येत होता. मात्र गेल्या आठ दिवसांपासून आवक खूप वाढत आहे. मात्र ग्राहक कमी असल्याने दर खूप कमी झाले आहेत. पुणेकरांनी आंबे खाल्ले पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचा थोडा फार फायदा होतो, असे आवाहन बलराज भोसले यांनी यावेळी केले आहे.
हेही वाचा -गदाधारीच्या गप्पाही आहेत गधाधारी, देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना टोला