महाराष्ट्र

maharashtra

काही निर्णय घेण्याची वेळ आलीच तर नागरिकांना दोन दिवसांचा वेळ देण्यात येईल - अजित पवार

By

Published : Apr 4, 2021, 6:52 PM IST

Updated : Apr 4, 2021, 7:06 PM IST

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर काही निर्णय घेण्याची वेळ आलीच तर नागरिकांना दोन दिवसांचा वेळ देण्यात येईल, त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, जेणेकरून लोकांना आवश्यक त्या वस्तू घेण्यासाठी, त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी वेळ मिळेल. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

ajit_pawar
ajit_pawar

पुणे - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर काही निर्णय घेण्याची वेळ आलीच तर नागरिकांना दोन दिवसांचा वेळ देण्यात येईल. त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, जेणेकरून लोकांना आवश्यक त्या वस्तू घेण्यासाठी, त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी वेळ मिळेल. त्यामुळे कुठलाही कठोर निर्णय घेण्याआधी नागरिकांचा विचार करण्यात येईल, असा निर्णय आजच्या बैठकीत झाला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार माध्यमांना माहिती देताना
अजित पवार यांनी आज पुण्यातून कॅबिनेट बैठकीसाठी उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कोरोना झाल्यानंतर सुरुवातीला नागरिक घाबरत होते, एकमेकांना भेटण्याचे देखील टाळत होते, परंतु आता मात्र परिस्थिती बदलली आहे.. त्यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते.मागच्यावेळी बाधित झालेला एक व्यक्ती पाच जणांना बाधीत करत होता तर यावेळेस ही संख्या वाढली असून बाधित व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाला म्हणजे 15 ते 20 जणांना बाधा होत असल्याचे निदर्शनास आले आहे..
Last Updated : Apr 4, 2021, 7:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details