पुणे - भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर पुण्यात हल्ला (Attack on Kirit Somaiya) झाला होता. त्यानंतर त्यांच्या व्यंगानुसार 'सामना'मध्ये (Saamana) बातमी देण्यात आली होती. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विचारले असता ते म्हणाले की, 'सामना' आता एखाद्या गल्लीतील वर्तमानपत्र झाला आहे. एखाद्या गल्लीतील वर्तमानपत्र जसे लोकप्रियतेसाठी लोकांना आवडणारी भाषा वापरते तसे 'सामना'चे चालले आहे. 'सामना'ने त्यांचा स्थर सोडलेला असून, त्यात त्यांना कुठलेही दुःख वाटत नाही, असे पाटील यांनी सांगितले. पुण्यातील कोथरूड येथे मोफत फिरता दवाखान्याचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
- सोमैया हल्ला प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र
भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेच्या 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत कोणालाही यात अटक करण्यात आली नाही. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मी वारंवार हेच सांगत आहे की सत्तेचा दूरउपयोग सुरू आहे. आमचे सरकार असताना कधीही पोलीस अधिकाऱ्यांवर असल्याप्रकारचा दबाव नसायचा. सध्या पोलीस अधिकाऱ्यांवर एवढा दबाव आहे की या 8 जणांना अटक देखील झालेली नाही. दाखल करण्यात आलेला गुन्हा हास्यास्पद आहे. या सरकारकडून आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही, म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत पत्र लिहिण्यात आले असून, त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे असे सांगितले आहे, असे पाटील म्हणाले.
- शिवसेनेमुळेच सोमैयांना लोकसभेचे तिकीट दिली नाही -
किरीट सोमैया यांचा आवाज बंद करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. त्यांना लोकसभेचे तिकीट देऊ नये यासाठी थेट युती दावाला लावली होती. आम्ही एक सुसंस्कृत पक्षाचे असून, युतीत वाद नको म्हणून आम्ही किरीट सोमैया यांच्यावर अन्याय केला, असे देखील यावेळी पाटील म्हणाले.
- ... तर आम्ही केंद्र सरकारला विनंती करू -