महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chandrakant Patil on Nawab Malik - दाऊदच्या नेतृत्वात झालेल्या सगळ्या गुन्हेगारांना सरकारचे समर्थन - चंद्रकांत पाटील

तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला तसेच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही आरोप झाल्यानंतर त्यांचाही राजीनामा घेण्यात आला. मग नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांच्याकडून मंत्रीपदाचा राजीनामा सरकार का घेत नाही, असा सवाल उपस्थित करुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP State President Chandrakant Patil ) यांनी आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

By

Published : Feb 26, 2022, 3:48 PM IST

Updated : Feb 26, 2022, 4:06 PM IST

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

पुणे- राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांना 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या आरोपींकडून बेनामी जमीन विकत घेण्याच्या आरोपाखाली ईडीने यांना अटक केली आहे. मलिक यांना अटक झाल्यानंतरही सरकार त्यांच्याकडून मंत्रीपदाचा राजीनामा घेत नाही. याचा अर्थ असा की 1993 साली दाऊदच्या नेतृत्वात झालेल्या सगळ्या गुन्हेगारांना सरकार समर्थन करत आहे. त्यावेळचे बॉम्बस्फोट कसे बरोबर होते. त्यांना मदत करणारे नवाब मलिक हे कसे बरोबर होते, असा दाखवण्याचा हा प्रयत्न सुरू असून भारतीय जनता पक्ष हे सहन करणार नाही, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP State President Chandrakant Patil ) यांनी व्यक्त केले आहे.

बोलताना चंद्रकांत पाटील

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. आम्ही मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण, त्यांनी दिला नाही. यापूर्वी संजय राठोड व अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. मग नवाब मलिक यांच्याकडून राजीनामा का घेतला जात नाही, असा सवालही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित करत आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

मोदी ज्या स्टेशनमधून प्रवास करणार आहेत, त्याला स्वातंत्रवीर सावरकर हे नाव द्यावे -महाविकास आघाडी सरकारमध्ये असेपर्यंत शिवसेनेचे मत परिवर्तन होऊ शकत नाही. टिपू सुलतानची जयंती साजरी करायची हे शिवसेनाला चालते. पण, सावरकरांमुळे त्यांची निष्ठा व मन विचलित होणार असेल तर त्यांनी सावरकर काढायचे नाही हे त्यांच्या कॉमन मिनिमन प्रोग्राममध्ये ठरलेले आहे. त्यामुळे ते सत्तेत आहे तोपर्यंत असच चालणार आहे. 6 मार्चला पुणे दौऱ्यावर येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) ज्या स्टेशनमधून प्रवास करणार आहे त्याला स्वातंत्रवीर सावरकर हे नाव द्यावे, अशी मागणी मी मोदी यांच्याकडे केली आहे, असेही यावेळी पाटील म्हणाले.

भाजप कटीबद्ध -मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. वेळप्रसंगी मी आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) नजीकच्या काळात दिल्लीत जाऊन संबंधित मंत्र्यांची भेट घेणार आहे, असेही यावेळी पाटील म्हणाले.

हेही वाचा -Maratha Reservation : राज्य सरकारने शब्द पाळला नाही म्हणून, आमरण उपोषणाचा निर्णय : छत्रपती संभाजीराजे

Last Updated : Feb 26, 2022, 4:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details