महाराष्ट्र

maharashtra

Chandrakant Patil : लाथ मारायची आणि नंतर सॉरी म्हणायचे, अशी महाविकास आघाडीची वृत्ती - भाजप नेते चंद्रकांत पाटील

By

Published : Apr 26, 2022, 7:05 AM IST

Updated : Apr 26, 2022, 7:54 AM IST

लाथ मारायची आणि सॉरी म्हणायचे, अशी वृत्ती महाविकास आघाडीची ( Chandrakant Patil on maha vikas aghadhi ) आहे. तीन दिवस सलग नेत्यांच्या गाड्यांवर दगड फेकायचे ( Chandrakant Patil on meeting on loudspeaker ) आणि मग म्हणायचे एकत्र बसून चर्चा करू. त्यांना जे करायचे ते करू द्या, असे चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil news on kirit somaiya in pune ) म्हणालेत.

Chandrakant Patil on maha vikas aghadhi
महाविकास आघाडी टीका चंद्रकांत पाटील

पुणे - लाथ मारायची आणि सॉरी म्हणायचे, अशी वृत्ती महाविकास आघाडीची ( Chandrakant Patil on maha vikas aghadhi ) आहे. तीन दिवस सलग नेत्यांच्या गाड्यांवर दगड फेकायचे ( Chandrakant Patil on meeting on loudspeaker ) आणि मग म्हणायचे एकत्र बसून चर्चा करू. त्यांना जे करायचे ते करू द्या, असे चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil news on kirit somaiya in pune ) म्हणालेत. राज्यात हनुमान चालिसा पठणावरून राजकारण तापलेले असताना मशिदींवरील भोंग्यांबाबत राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला भाजपकडून कोणीही उपस्थित राहिले नाही. याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil in pune news ) यांनी सदर प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा -Pune Police : पुणे पोलिसांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, चौघे अटकेत

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत राज्यपाल ( Chandrakant Patil on president rule in Maharashtra ) ठरवतात. आम्ही कुठली मागणी धरली नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच, राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवली असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच, सर्वपक्षीय बैठकीला भाजपकडून कोणीही गेले नाही यावर बोलताना, सर्वपक्षीय बैठकीला आम्ही जाणार नाही. सर्वांनी एकत्र बसून चर्चा करू, निर्णय घेऊ असे वातावरण माहाविकास आघाडी सरकारने ठेवले नाहीतच. सर्वपक्षीय बैठकीत दिलीप वळसे पाटील यांना मुंबईत काही निर्णय घेण्याचा अधिकार आहे? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला.

एकत्रित बसण्यामध्ये गांभीर्य दिसला पाहिजे. मुख्यमंत्री बैठकीला येणार नाहीत. या राज्यात पन्नास वर्षे राजकारण केले, ज्यांच्या शब्दाला वजन आहे ते येणार नाहीत, मग कोण येणार, तर दिलीप वळसे पाटील. त्यांना मुंबईत निर्णय घेण्याचे अधिकार आहे का? दिलीप वळसे पाटील बिचारे आहेत. मुंबईचे निर्णय मातोश्रीवरून होणार. ज्या बैठकीत फक्त चहा बिस्किटे खाल्ली जाणार तिथे जाण्याचे काही कारण नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले

हेही वाचा -Hanuman Chalisa Contraversy : 'महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं....', राणा दांपत्याच्या भूमिकेवर पवारांची जोरदार टीका

Last Updated : Apr 26, 2022, 7:54 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details