महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर, गृहनिर्माण मंत्री यांनीही मानले आभार! - Post viral

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या सहीत आमदारकीचा देखील राजीनामा दिल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही अनिल वर्षाच्या कारकिर्दीत केलेल्या कामांबाबत संतोष व्यक्त केला आहे.

Jitendra Awhad
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

By

Published : Jun 30, 2022, 10:20 AM IST

मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या सहीत आमदारकीचा देखील राजीनामा दिल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही अनिल वर्षाच्या कारकिर्दीत केलेल्या कामांबाबत संतोष व्यक्त केला आहे. तसेच या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी दाखवलेल्या विश्वासाला बाबत त्यांचेही आभार मानले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांचे निवेदन -माझा अडीच वर्षांचा मंत्री म्हणून कार्यकाळ हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझ्या दृष्टीने तरी चांगला गेला. खूप चांगले निर्णय घेता आले आहेत. लोकोपयोगी कामे करता आली. मंत्री म्हणून काम करत असताना या अडीच वर्षांत गृहनिर्माण विभागाचे माझे पहिले सचिव संजीव कुमार, त्यानंतरचे गृहनिर्माण सचिव श्रीनिवासन आणि आत्ताचे सचिव मिलिंद म्हैस्कर त्याचबरोबर म्हाडाचे सचिव डिग्गीकर, म्हाडाचे मुंबई विभागाचे मुख्य अधिकारी म्हसे, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी सतिश लोखंडे, रिपेअर बोर्डाचे अधिकारी डोंगरे यांचे माझ्या सर्व निर्णयांमध्ये अभूतपूर्व योगदान होते. माझे यश मोजले तर त्यामध्ये माझ स्वत:च योगदान 1 टक्का इतकेच आहे. बाकी या सगळ्या अधिका-यांचे योगदान आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्यांचे योगदान हे 99 टक्के आहे.

मंत्री पदाची जबाबदारी असताना अधिका-यांच्या सहका-याशिवाय व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय काम करणे हे निव्वळ अशक्य असतं. त्यांचा अनुभव, त्यांचे ज्ञान हे वेळोवेळी उपयोगी पडले. त्यामुळेच जे काही निर्णय घेता आले, ते योग्यरितीने पुढे नेण्यात मी यशस्वी झालो आहे.

परत एकदा गृहनिर्माण विभाग, म्हाडा, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण यामधील सर्व अधिका-यांचे, कर्मचारी वर्गाचे, माझे वाहन चालवणारे माझे सारथी, माझ्या बरोबर फिरणा-या चोपदारापासून, माझ्या शासकीय निवासस्थानी येणा-या प्रत्येकाची नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था करणारे स्वयंपाक घरातील माझे कर्मचारी. कारण माझ्याकडून कधी कोणी अडीच वर्षांत उपाशीपोटी गेला असे कधीच झाले नाही. या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो. कारण यांच्यामुळेच मला सहज काम करता आले आहे.

सत्ता येते, सत्ता जाते पण, या सगळ्यांनी केलेले सहकार्य मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे त्याबद्दल फारसे काही न बोलता आपण दिलेल्या सहका-याबद्दल आपले आभार मानतो, आणि हो आणि कुणाचे मन दुखावले असेल तर मोठ्या मनानी माफ करावे. आपला -डॉ. जितेंद्र आव्हाड अशी भावनिक पोस्ट केली आहे.

हेही वाचा -सुप्रीम कोर्टाचा निर्णय वादग्रस्त, मी 45 वर्षांत कधीच असा निर्णय बघितला नाही - घटनातज्ज्ञ उल्हास बापट

ABOUT THE AUTHOR

...view details