पणजी -महिला साहित्य संमेलनात गोमंतकीय महिलांच्या जीवनशैली वर प्रकाशझोत टाकण्यात आला. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाचे उद्घाटन कवयित्री छाया महाजन व मराठी साहित्य अकादमीचे अध्यक्ष प्रा अनिल सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. येथील मिनेझिस ब्रागांजा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या महिला संमेलनात गोमंतकातील अनेक कवयित्री सहभागी होऊन त्यांनी आपल्या कवितांचे वाचन केले.
गोमंतकातील ग्रामीण भागात धीललो आणि धालोत्सव साजरा करताना मराठी साहित्याचा आधार घेतला जातो. येथील जीवनशैलीवर साहित्याचा प्रभाव दिसून येत असल्याचे कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा पौर्णिमा केरकर यांनी सांगितले.
काव्यातून महिलांच्या जीवनशैलीवर प्रकाशझोत -